#चिंतन
बऱ्याच वेळा कसं होत कि आपल्याला सांगणारे अनेक जण असतात पण सारेच आपल्या हिताचं सांगतीलच अस नाही. मुळात दुसऱ्याला सांगण्यापूर्वी ते आपल्याला माहित असावं.जे काही दुसऱ्याला सांगायचं आहे ते समोरच्याला समजलं पाहिजे अथवा त्याला समजेल अश्या भाषेत आपण प्रस्तुत केलं पाहिजे.ते त्याच्या हिताचं असलं पाहिजे.नाहीतर चर्चेच्या ओघात एखादा विषय निघतो आणि तो आपल्या स्मरणात राहतो प्रसंगी आपण तो समोरच्याला सांगत सुटतो पण त्यामागचं मूल्यांकन आपण आधी करायला हवं नंतरच तो विषय इतरांसमोर मांडावा.
आपण एक दाणा पेरला कि तो हजारो दाणे परत करतो. निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत, इतरांना आपण काय सांगत आहोत ,दुःख, राग , द्वेष पेरत असू तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल.आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काही शंकाच नाही.
आणि एकणारही नेभळट नसावा बरं.एकणाऱ्या मध्येही एक वर्ग असा असतो जो समोरच्याच ऐकत असतो आणि सोडून देत असतो.त्याला काही घेणं देणं नसत तुम्ही काहीही म्हणा हिताचं अथवा अहिताचं .तो सांगणाऱ्याला मूर्ख समजत असतो.असे किती सांगणारे आले ....मला सारं कळतं... मुळात त्याला काहीच कळत नसतं.... आणि खरं सांगायचं तर अश्या लोकांची संख्याही भलतीच वाढलय.
दुसरा वर्ग असा असतो सांगण्याऱ्याच ऐकत असतो इतरांना बोलून दाखवत असतो. पण का कुणास ठाऊक तो चिंतन करीत नाही.समोरचा बोलतोय ते योग्य, अयोग्य काही तपासून पाहत नाही. विसंबून राहतो. अरे पण किती काळ विसंबून राहणार तुझं हित ,अहित तुला कळायला नको ? आज अश्या लोकांचा फायदा घेणाऱ्या टोळ्याच आपल्याला समाजात वावरताना जागोजागी दिसतील. जस लहान मुलांच्या हातातील बाहुल्यांची जशी अवस्था असते काहीशी त्याच प्रकारची अवस्था ह्या वर्गाची असते.
तिसरा वर्ग असा असतो जो समोरच्याच ऐकत असतो ,मनात त्याचं चिंतन करत असतो. आपल्याजवळ आलेल्या विचारांच मूल्यांकन आपण आजवर कमावलेल्या ज्ञानप्रकाशत करून पाहतो. तो कधीही वाद घालीत बसत नाहीत. तो सत्याचा शोध घेतो. ज्याला सत्याची प्राप्ती झाली आहे असा मनुष्य अंतर्यामी शांत होऊन जातो. अहंकारी माणसे वादासाठी निमित्त शोधत असतात.
अनेकदा वाद घालण्याचे मुद्दे अत्यंत क्षुल्लक असतात, पण त्यामुळे मनाचे संतुलन ढळते. दिवसेंदिवस अहंकार परिपुष्ट होत राहतो.अनेकदा आपले मत दुसऱ्यावर लादण्यासाठी माणसे वाद घालीत बसतात, पण हे वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण नाही. माणसाने प्रत्येकाची भूमिका समजावून घ्यावी. भिन्न भिन्न विचार प्रवाह या विकासाच्या निरनिराळ्या पायऱ्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. वैचारिक मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे......आज माणूस बौद्धिकदृष्ट्या आश्चर्यकारक प्रगत होतो आहे. पण मानसिकदृष्ट्या त्याचे खूप पतन होते आहे.सुखसंवादामध्ये हितासाठी बोलले जाते. अनेक विचारांची फुले एकत्र करून सद्भावांचा गुच्छ तयार केला जातो. माणसाने बोलणे सुधारण्यापेक्षा वागणे सुधाराले पाहिजे.ज्यांचे आचरण मंगल आहे ती माणसे कधी वादात पडत नाहीत.
प्रत्यक्ष आचरणात काही नसते, पण बौद्धिक अभ्यास खूप झालेला असतो असा माणूस ज्ञानाच्या अहंकाराने वाद घालून स्वत:चे नुकसान करून घेतो.त्याला तुम्ही उत्तम श्रोता कसं म्हणाल. चर्चेच्या ओघात वाहवत न जाता तिच्या मुळाशी पोहचण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला पाहिजे.नंतरच त्या गोष्टीच समर्थन आपण करायला हवं....
शेवटी चिंतन महत्वाचं....
.........नितेश पाटील
१५.११.१५
९६३७१३८०३१
बऱ्याच वेळा कसं होत कि आपल्याला सांगणारे अनेक जण असतात पण सारेच आपल्या हिताचं सांगतीलच अस नाही. मुळात दुसऱ्याला सांगण्यापूर्वी ते आपल्याला माहित असावं.जे काही दुसऱ्याला सांगायचं आहे ते समोरच्याला समजलं पाहिजे अथवा त्याला समजेल अश्या भाषेत आपण प्रस्तुत केलं पाहिजे.ते त्याच्या हिताचं असलं पाहिजे.नाहीतर चर्चेच्या ओघात एखादा विषय निघतो आणि तो आपल्या स्मरणात राहतो प्रसंगी आपण तो समोरच्याला सांगत सुटतो पण त्यामागचं मूल्यांकन आपण आधी करायला हवं नंतरच तो विषय इतरांसमोर मांडावा.
आपण एक दाणा पेरला कि तो हजारो दाणे परत करतो. निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत, इतरांना आपण काय सांगत आहोत ,दुःख, राग , द्वेष पेरत असू तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल.आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काही शंकाच नाही.
आणि एकणारही नेभळट नसावा बरं.एकणाऱ्या मध्येही एक वर्ग असा असतो जो समोरच्याच ऐकत असतो आणि सोडून देत असतो.त्याला काही घेणं देणं नसत तुम्ही काहीही म्हणा हिताचं अथवा अहिताचं .तो सांगणाऱ्याला मूर्ख समजत असतो.असे किती सांगणारे आले ....मला सारं कळतं... मुळात त्याला काहीच कळत नसतं.... आणि खरं सांगायचं तर अश्या लोकांची संख्याही भलतीच वाढलय.
दुसरा वर्ग असा असतो सांगण्याऱ्याच ऐकत असतो इतरांना बोलून दाखवत असतो. पण का कुणास ठाऊक तो चिंतन करीत नाही.समोरचा बोलतोय ते योग्य, अयोग्य काही तपासून पाहत नाही. विसंबून राहतो. अरे पण किती काळ विसंबून राहणार तुझं हित ,अहित तुला कळायला नको ? आज अश्या लोकांचा फायदा घेणाऱ्या टोळ्याच आपल्याला समाजात वावरताना जागोजागी दिसतील. जस लहान मुलांच्या हातातील बाहुल्यांची जशी अवस्था असते काहीशी त्याच प्रकारची अवस्था ह्या वर्गाची असते.
तिसरा वर्ग असा असतो जो समोरच्याच ऐकत असतो ,मनात त्याचं चिंतन करत असतो. आपल्याजवळ आलेल्या विचारांच मूल्यांकन आपण आजवर कमावलेल्या ज्ञानप्रकाशत करून पाहतो. तो कधीही वाद घालीत बसत नाहीत. तो सत्याचा शोध घेतो. ज्याला सत्याची प्राप्ती झाली आहे असा मनुष्य अंतर्यामी शांत होऊन जातो. अहंकारी माणसे वादासाठी निमित्त शोधत असतात.
अनेकदा वाद घालण्याचे मुद्दे अत्यंत क्षुल्लक असतात, पण त्यामुळे मनाचे संतुलन ढळते. दिवसेंदिवस अहंकार परिपुष्ट होत राहतो.अनेकदा आपले मत दुसऱ्यावर लादण्यासाठी माणसे वाद घालीत बसतात, पण हे वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण नाही. माणसाने प्रत्येकाची भूमिका समजावून घ्यावी. भिन्न भिन्न विचार प्रवाह या विकासाच्या निरनिराळ्या पायऱ्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. वैचारिक मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे......आज माणूस बौद्धिकदृष्ट्या आश्चर्यकारक प्रगत होतो आहे. पण मानसिकदृष्ट्या त्याचे खूप पतन होते आहे.सुखसंवादामध्ये हितासाठी बोलले जाते. अनेक विचारांची फुले एकत्र करून सद्भावांचा गुच्छ तयार केला जातो. माणसाने बोलणे सुधारण्यापेक्षा वागणे सुधाराले पाहिजे.ज्यांचे आचरण मंगल आहे ती माणसे कधी वादात पडत नाहीत.
प्रत्यक्ष आचरणात काही नसते, पण बौद्धिक अभ्यास खूप झालेला असतो असा माणूस ज्ञानाच्या अहंकाराने वाद घालून स्वत:चे नुकसान करून घेतो.त्याला तुम्ही उत्तम श्रोता कसं म्हणाल. चर्चेच्या ओघात वाहवत न जाता तिच्या मुळाशी पोहचण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला पाहिजे.नंतरच त्या गोष्टीच समर्थन आपण करायला हवं....
शेवटी चिंतन महत्वाचं....
.........नितेश पाटील
१५.११.१५
९६३७१३८०३१
No comments:
Post a Comment