Friday, May 13, 2016

आपलं असतं का काही

#आपलं_असतं_का_काही
          ज्याप्रमाणे युद्ध म्हंटले कि त्यात बलिदान हे आलेच. एका मागून एक बलिदानाची शृंखला चालूच असते. त्याचप्रमाणे मनातील विचारांच्या युद्धात आपण आपल्याच (मिळवलेल्या) विचारांचे बलिदान प्रतिक्षण देत असतो जाणतेपणाने किव्हा नकळत...सांगायचा मुद्दा असा कि आपल्या मनात प्रतिदिन हजारोंच्या संख्येने विचार चालू असतात. ते सारेच विचार आपण प्रत्यक्षात उतरत नाहीत, उतरवू शकत नाही.
          त्यात असही होतं जर एखादा नवीन मुद्दा उपस्थित होतो तेव्हा त्या अनुषंगाने त्या दिशेने आपले विचार प्रवाहित होतात.आणि जुने विचार हवा होतात किव्हा शमून जातात. एकंदरीतच असं लक्षात येते कि माणसांच्या विचारांची वृद्धी होत असते आणि अंतही...
           पण माणूस स्वतःच्या विचाराने जगत नसतो. अर्थात तो आता हे मान्य करणार नाही. मुळात तो जन्मालाच स्वच्छ आणि निर्मळ पाण्याप्रमाणे आलेला असतो. त्याच्या बुद्धीला ज्ञानरूपी विचारांची भेसळ हि दिवसागणिक हळूहळू होत जाते. "पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिले वैसा" या उक्तीप्रमाणे सारं काही घडत जातं.
          या विश्वात विचार जन्मास आले कसे ते मला माहित नाही पण त्या विचारांच्या आधारावर आणि बांधणीवरच हे जग स्तिथ आहे. त्या विचारांच्या निर्मात्याचा मी कृतज्ञापूर्वक आभारी आहे. प्रत्येकजण त्या विचारांच चांगलं, वाईट भांडवल करून व्यक्त होत असतो. आणि त्या विचारांना आपलं समजत असतो. पण ते विचार मुळातच आपले नसतात. जर आपले असते तर सारे आपल्या आज्ञेत राहिले असते.
         आणि हेही एक सत्य आहे कि मनातील विचार हे समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांप्रमाणे असतात, त्यांना अंत नाही. पण मनात विचारांच्या लाटा उसळत असतील, उत्पन्न होत असतील तर त्या लाटा उत्पन्न करणाऱ्या शक्तीबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे.
...नित

No comments: