सस्नेह जय शिवराय.... १४/८/२०१५
१५ आॅगष्ट -----------------------नित
हा आपला स्वातंत्र दिवस आहे हे विसरता येणार नाही. कारण ते स्वातंत्र मिळवण्यासाठी कैकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, नरक यातना भोगल्या. ते सर्व श्रुत आहेस, तो ईतीहास नव्याने सांगायची गरज नाही. कारण बहुतांशी लोकं आणि त्यात आपण निवडुन दिलेले आणि आपल्याच ऊरावर बसलेले राजकारणी महापुरषांच फक्त कौतुक करण्यात धन्यता मानतात. ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केल तेव्हा आपला देश स्वातंत्र झाला. महापुरषांचे थोरवे गाता गाता ह्यांना घाम सुटतो. Ac मधे राहणारी माणसं ही, ह्याना चटक्याची जान ती कुठली. पण अरे बाबानो आज देश अधोगतीला चालला आहे, तिथे तुम्ही लक्ष देणार की नाही ? आज कोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार नाही...?
आज ह्या देशात नक्की सुरक्षा कुणाची आहे ? सामान्य माणसाची ? तर मुळीच नाही..!! सुरक्षा फक्त ह्या राजकारणी आणि श्रीमंत लोकांची. ह्यांना झेडप्लस सुरक्षा आणि आपल्या देशातील बहुतांशी जनतेला झेडप्लस ह्या शब्दाचा अर्थच माहीत नाही, काहीना तर झेडही समजत नाही. सारा पोलीसांचा फौजफाटा ह्यांच्या मागे. मला हे कळत नाही की ह्या लोकाना ईतक्या सिक्युरीटीची गरज काय असते ? ते पोलीसही विचार करत असतील, अरे देशाप्रती असलेल्या निष्ठेपायी ह्या खात्यात आलो आणि ह्यांची सेवा करावी लागते... राजकारणी लोकांना दोष देण्याची अनेक कारणे आहेत. आता हेच घ्या देशात अतीरेकी कारवाया झाल्या की मग सुरक्षा बळकट करायची. आधीच हे अतीरेकी सुरक्षारक्षकानी प्राण पणाला लावुन आपले सहकारी गमावुन पकडायचे. आमच्या कायद्याने त्याना वर्षानुवर्षे सांभाळत बसायचं. विषेश म्हणजे आपली लोकंही तितकीच विचित्र. अाता अतीरेकी म्हटल्यावर मग तो कुठलाही असो अण् कोणत्याही देशातला असो. त्याच्याप्रती लोकं इतकी सहनभुती का दाखवतात तेच मला कळत नाही. आताच ताजंच ऊदाहरण घ्या त्या याकुबच.त्याला फाशीची शिक्षा झाली तर आपल्या देशातील राजकारणी, प्रतीष्ठीत, श्रीमंत लोकांना त्याचा पुळका का यावा ? हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. यांनी अकलेचे तारे तोडत राष्ट्रपतींकडे खैरात मागतात, तुम्हाला लाजा कशा वाटत नाही. कधी त्यांनी घडविलेल्या स्फोटात निरअपराध लोकांचा गेलेला बळी आणि त्या कारणे त्यांच्या कुटुंबियाना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्यात तुम्ही कीती सहभागी झालात.? खरं तर ह्या प्रकरणावरुन ह्यांचे काही त्या आतंवाद्याशी लागेबांधे तर नाहीत ना,? ही मनात पाल चुकचूकते. कायदा सुव्यवस्था बदलण्याची गरज आहे. मि (मि म्हणुन काही ऊपयोग नाही म्हणा)तर म्हणेन ह्यासाठी शुट अॅट साईट चा निर्णय पाहीजे. हि असली आतंगवादि औलाद पोसायसीच कशाला ?
अरे स्वातंत्र मिळविन्या साठी कीती खस्ता खाल्या त्या विरांनी, आणि आम्ही काय करतोय ....?
१५ आॅगष्ट -----------------------नित
हा आपला स्वातंत्र दिवस आहे हे विसरता येणार नाही. कारण ते स्वातंत्र मिळवण्यासाठी कैकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, नरक यातना भोगल्या. ते सर्व श्रुत आहेस, तो ईतीहास नव्याने सांगायची गरज नाही. कारण बहुतांशी लोकं आणि त्यात आपण निवडुन दिलेले आणि आपल्याच ऊरावर बसलेले राजकारणी महापुरषांच फक्त कौतुक करण्यात धन्यता मानतात. ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केल तेव्हा आपला देश स्वातंत्र झाला. महापुरषांचे थोरवे गाता गाता ह्यांना घाम सुटतो. Ac मधे राहणारी माणसं ही, ह्याना चटक्याची जान ती कुठली. पण अरे बाबानो आज देश अधोगतीला चालला आहे, तिथे तुम्ही लक्ष देणार की नाही ? आज कोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार नाही...?
आज ह्या देशात नक्की सुरक्षा कुणाची आहे ? सामान्य माणसाची ? तर मुळीच नाही..!! सुरक्षा फक्त ह्या राजकारणी आणि श्रीमंत लोकांची. ह्यांना झेडप्लस सुरक्षा आणि आपल्या देशातील बहुतांशी जनतेला झेडप्लस ह्या शब्दाचा अर्थच माहीत नाही, काहीना तर झेडही समजत नाही. सारा पोलीसांचा फौजफाटा ह्यांच्या मागे. मला हे कळत नाही की ह्या लोकाना ईतक्या सिक्युरीटीची गरज काय असते ? ते पोलीसही विचार करत असतील, अरे देशाप्रती असलेल्या निष्ठेपायी ह्या खात्यात आलो आणि ह्यांची सेवा करावी लागते... राजकारणी लोकांना दोष देण्याची अनेक कारणे आहेत. आता हेच घ्या देशात अतीरेकी कारवाया झाल्या की मग सुरक्षा बळकट करायची. आधीच हे अतीरेकी सुरक्षारक्षकानी प्राण पणाला लावुन आपले सहकारी गमावुन पकडायचे. आमच्या कायद्याने त्याना वर्षानुवर्षे सांभाळत बसायचं. विषेश म्हणजे आपली लोकंही तितकीच विचित्र. अाता अतीरेकी म्हटल्यावर मग तो कुठलाही असो अण् कोणत्याही देशातला असो. त्याच्याप्रती लोकं इतकी सहनभुती का दाखवतात तेच मला कळत नाही. आताच ताजंच ऊदाहरण घ्या त्या याकुबच.त्याला फाशीची शिक्षा झाली तर आपल्या देशातील राजकारणी, प्रतीष्ठीत, श्रीमंत लोकांना त्याचा पुळका का यावा ? हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. यांनी अकलेचे तारे तोडत राष्ट्रपतींकडे खैरात मागतात, तुम्हाला लाजा कशा वाटत नाही. कधी त्यांनी घडविलेल्या स्फोटात निरअपराध लोकांचा गेलेला बळी आणि त्या कारणे त्यांच्या कुटुंबियाना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्यात तुम्ही कीती सहभागी झालात.? खरं तर ह्या प्रकरणावरुन ह्यांचे काही त्या आतंवाद्याशी लागेबांधे तर नाहीत ना,? ही मनात पाल चुकचूकते. कायदा सुव्यवस्था बदलण्याची गरज आहे. मि (मि म्हणुन काही ऊपयोग नाही म्हणा)तर म्हणेन ह्यासाठी शुट अॅट साईट चा निर्णय पाहीजे. हि असली आतंगवादि औलाद पोसायसीच कशाला ?
अरे स्वातंत्र मिळविन्या साठी कीती खस्ता खाल्या त्या विरांनी, आणि आम्ही काय करतोय ....?
स्वातंत्र दिन येता जवळी..राष्ट्रप्रेम ते ऊफाळुन येई....
गोडवे गाती जन शुर विरांचे..
शुरां तव वंदन ,नमन, श्रध्दांजली....
सोसल्या यातना ज्या शुरविरांनी..
भोगीलेे नरकवास तयांनी राष्ट्रापायी....
आपणा कळले का तयांचे बलीदान..
दाखविन्या जनांस पर वंदन खास....
वर्षभर नुसता घोषनांचा भाडीमार..
वर्षाअखेर मात्र परवड ,सुकाळ.....
कुणिही यावे दंगली,बाॅमस्फोट करावे..?
सामान्य जणतेने रक्त,थारेळ्यात पडावे....
आम्ही तया वर्षानुवर्षे ईमाने पोसावे..?
आमच्याच वकीलाने त्यांच्या बाजुने लढावे....?
परमेश्वर कृपेने पिढीत जणतेस न्याय मिळाला..
पण प्रतिष्ठीत लोकांना त्यांचा पुळका आला....
थोर महापुरषांनी स्वातंत्र मिळवुन दिलं..
या भ्रष्ट, क्रुर लोकांनी ते धुळीस मिळवलं....
ते जगले राष्ट्रासाठी..
भ्रष्ट जगतात रुपयांसाठी..
आपण जगतो प्रपंचासाठी...
स्वातंत्रदिन फक्त दाखवण्यासाठी....
तुम्हा आम्हा सर्वांस विचार करणे आहे..
स्वःतासाठी न जगता ईतरांसाठी जगणे आहे...
हिच श्रध्दांजली त्या शुरांस आहे....
हिच श्रध्दांजली त्या शुरांस आहे....
...नित
आपण आपला दृष्टीकोण बदलला पाहीजे.
६८ वर्षे होत आली तरीही परीस्थीती बदललेली नाहीये, आणखीन बिकट झाली आहे. हि राजकारणी लोकं भाषनात म्हणतात तरुण पिढी बिघडली म्हणुन पण, त्याना बिघडवनारे कोण ? तर हे राजकारणी आणि श्रीमंत लोकं. यांच्या लग्न कार्यात, मतदानावेळेस फक्त आणि फक्त पार्टी .नळ्या नुळ्या आणि दारुचा महापुरच का तर आपण कमावलेली संपत्ती लोकाना दिसली पाहीजे आणि आपल्या मागे लोकांचा गोतावळा वाढावा म्हणुन... हिच त्यामागची भावना असते बाकी मला नाही वाटत दुसरा काही ऊद्देश असेल. आता तर लग्नात एक नविन फॅशन निघालय. भर मांडवात खास दारुसाठी एक रुम तयार करतात. आपल्याजवळ रुपया आहे, तो तुम्ही खर्च करा, दाखवा. त्यात काही वावगं नाहीये. पण तो कश्या प्रकारे करावा त्याचं तारतम्य हवं की नको. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय संस्कार देत आहोत हे आपल्याला कळु नये. आज आपण आपल्या समाजात बघाल तर ग्रज्वेट मुलं वनवन नोकरीसाठी भटकतात. पण नोकरी नाही. २० वर्षाची मुलं व्यसनानं मरतात, आणि ७० वर्षाचा म्हातारा त्याला खांदा देतो. हि परीस्थीती कुणी निर्माण केली याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कशी सुधारणार पिढी ? पुर्वी मतदानासाठी ५०ते१०० रुपये दिले की मतांची भिक मागणारा पुठारी अमक्या निशाणीवर दे तमक्या निशाणिवर दे असं सांगुन मतदान मागत असे.
आता आकडा वाडला आहे आणि नळ्या नुळ्या, दारू पाजुन हे लोकांच्या डोक्यावर बसले आणी समाज खलास करुन टाकला. त्याना राष्ट्रप्रेम कुठुन दिसनार..? काहींचा अपवाद असेलही.
आणि लोकानाही अकली नाहीत हो...!
मतदान आलं की, सारं घबाड त्या पक्षावाल्यांच्या मागे.
लोकांना अद्याप दान ह्या शब्दाचा अर्थच माहीत नाहीये. मत दान आहे ते..... बोलु नये पण बोलतेच असं नळ्या नुळ्या खावुन, दारू पिवुन, अक्कल गहान ठेऊन कुठलही दान केलं तर त्याचा मोबदला तो काय मिळनार. ह्या लोकांनी स्वातंत्र तर बाजुला राहुद्या पण सर्व व्याख्या बदलुन टाकल्या.
आज धर्माची व्याख्या काय ?
समाजातील सर्व स्तरातील प्राणीमात्रांना धरुन ठेवणे. म्हणजेच सामाजीक कार्याची पावती (आणि आज एकमेकात तेढ निर्माण करुन ? ) मिळते.....?
आज धनाची व्याख्या काय ?
संयमीत/ समाधानी जीवनासाठी जेवढे आवश्यक तेवढे (धरण फुटोस्तोवर ?) धनार्जन करणे.
म्हणजेच श्रीमंती ......?
आज कर्माची व्याख्या काय ? :-
मर्यादीत इच्छा आकांक्षा ( ईतरांच्या टांगणीवर ? ) ठेवणे.
म्हणजे कर्म.....?
आणि ईतराना दोष देन्यात तरी काय अर्थ आहे आपण स्वःता आधी बदल केला पाहीजे. स्वःतासाठी जगत असताना समाजाचाही विचार करायला पाहीजे. काहीका असेना योगदान दिल पाहिजे आणि भावना रुजवली पाहिजे. काल परवाच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच ऊदाहरन घेऊन बघुया काय जमतय का. जे विर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी शहिद झाले ,त्यानी जे स्वतंत्र भारताच स्वप्न पाहिलं आणि ज्या विरानी ते आपल्या खांद्यावर लिलया पेलुन स्वातंत्र मिळवलं ते आपण ईतक्या वर्षांची शुरविर साधुसंतांची परंपरा असुनही टिकवु शकत नसाल तर मग काय अर्थ आहे. आणि परीस्थीती जर अशीच राहीली तर कसं होणार..... आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय वाढुन ठेवतो आहोत ह्याचा विचार करायला पाहीजे आपण लाख संपत्ती आपल्या मुलांसाठी कमावुन ठेवु पण जर समाज खराब असेल तर तो जगनार कसा हा चिंतनाचा विषय आहे.
६८ वर्षे होत आली तरीही परीस्थीती बदललेली नाहीये, आणखीन बिकट झाली आहे. हि राजकारणी लोकं भाषनात म्हणतात तरुण पिढी बिघडली म्हणुन पण, त्याना बिघडवनारे कोण ? तर हे राजकारणी आणि श्रीमंत लोकं. यांच्या लग्न कार्यात, मतदानावेळेस फक्त आणि फक्त पार्टी .नळ्या नुळ्या आणि दारुचा महापुरच का तर आपण कमावलेली संपत्ती लोकाना दिसली पाहीजे आणि आपल्या मागे लोकांचा गोतावळा वाढावा म्हणुन... हिच त्यामागची भावना असते बाकी मला नाही वाटत दुसरा काही ऊद्देश असेल. आता तर लग्नात एक नविन फॅशन निघालय. भर मांडवात खास दारुसाठी एक रुम तयार करतात. आपल्याजवळ रुपया आहे, तो तुम्ही खर्च करा, दाखवा. त्यात काही वावगं नाहीये. पण तो कश्या प्रकारे करावा त्याचं तारतम्य हवं की नको. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय संस्कार देत आहोत हे आपल्याला कळु नये. आज आपण आपल्या समाजात बघाल तर ग्रज्वेट मुलं वनवन नोकरीसाठी भटकतात. पण नोकरी नाही. २० वर्षाची मुलं व्यसनानं मरतात, आणि ७० वर्षाचा म्हातारा त्याला खांदा देतो. हि परीस्थीती कुणी निर्माण केली याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कशी सुधारणार पिढी ? पुर्वी मतदानासाठी ५०ते१०० रुपये दिले की मतांची भिक मागणारा पुठारी अमक्या निशाणीवर दे तमक्या निशाणिवर दे असं सांगुन मतदान मागत असे.
आता आकडा वाडला आहे आणि नळ्या नुळ्या, दारू पाजुन हे लोकांच्या डोक्यावर बसले आणी समाज खलास करुन टाकला. त्याना राष्ट्रप्रेम कुठुन दिसनार..? काहींचा अपवाद असेलही.
आणि लोकानाही अकली नाहीत हो...!
मतदान आलं की, सारं घबाड त्या पक्षावाल्यांच्या मागे.
लोकांना अद्याप दान ह्या शब्दाचा अर्थच माहीत नाहीये. मत दान आहे ते..... बोलु नये पण बोलतेच असं नळ्या नुळ्या खावुन, दारू पिवुन, अक्कल गहान ठेऊन कुठलही दान केलं तर त्याचा मोबदला तो काय मिळनार. ह्या लोकांनी स्वातंत्र तर बाजुला राहुद्या पण सर्व व्याख्या बदलुन टाकल्या.
आज धर्माची व्याख्या काय ?
समाजातील सर्व स्तरातील प्राणीमात्रांना धरुन ठेवणे. म्हणजेच सामाजीक कार्याची पावती (आणि आज एकमेकात तेढ निर्माण करुन ? ) मिळते.....?
आज धनाची व्याख्या काय ?
संयमीत/ समाधानी जीवनासाठी जेवढे आवश्यक तेवढे (धरण फुटोस्तोवर ?) धनार्जन करणे.
म्हणजेच श्रीमंती ......?
आज कर्माची व्याख्या काय ? :-
मर्यादीत इच्छा आकांक्षा ( ईतरांच्या टांगणीवर ? ) ठेवणे.
म्हणजे कर्म.....?
आणि ईतराना दोष देन्यात तरी काय अर्थ आहे आपण स्वःता आधी बदल केला पाहीजे. स्वःतासाठी जगत असताना समाजाचाही विचार करायला पाहीजे. काहीका असेना योगदान दिल पाहिजे आणि भावना रुजवली पाहिजे. काल परवाच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच ऊदाहरन घेऊन बघुया काय जमतय का. जे विर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी शहिद झाले ,त्यानी जे स्वतंत्र भारताच स्वप्न पाहिलं आणि ज्या विरानी ते आपल्या खांद्यावर लिलया पेलुन स्वातंत्र मिळवलं ते आपण ईतक्या वर्षांची शुरविर साधुसंतांची परंपरा असुनही टिकवु शकत नसाल तर मग काय अर्थ आहे. आणि परीस्थीती जर अशीच राहीली तर कसं होणार..... आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय वाढुन ठेवतो आहोत ह्याचा विचार करायला पाहीजे आपण लाख संपत्ती आपल्या मुलांसाठी कमावुन ठेवु पण जर समाज खराब असेल तर तो जगनार कसा हा चिंतनाचा विषय आहे.
niteshpatil715
नितेश पाटील








