कुणी वेळ देतं का वेळ...!!!
रस्त्याला दिसतंय का कुणी..??
जे आम्हाला स्पर्धेच्या जगात, आमच्या शाळेत सोडेल....
नको नको बरं...!!!
शाळेत घरी सारं तेच. शाळा, क्लास पुरता वैताग आणून सोडलाय..!!!
शाळेत जावं तर त्या स्पर्धा, शिक्षण, ते डे ,लिखाण काम...
घरी जावं तर होमवर्क, क्लास..च्यामारी नोकरी परवडेल हो ....
आमचा कुणी विचार करत नसेल का हो..???
आमचे भविष्य उज्वल करण्याची धडपड असेल....
पण आमचं बालपण चिरडलं जातंय नाही वाटत तुम्हाला...???
दिवसभर आईबाबा राबतात तशीच आमचीही गत...
बघा जमलं तर आमचाही विचार करा..!!
......नितेश पाटील
नमस्कार ...सस्नेह जय शिवराय...... माझं असं काहीच नाही.ऐकलं, वाचलं, अनुभवलं तेच शब्दरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न.त्या तमाम उर्जास्त्रोत्राना माझा सलाम. आई जगदंबेची कृपा... प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज हिंदुपद्पाद्शा, श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय....!!
!->
Friday, January 22, 2016
व्यथा शाळेतल्या मुलांची
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment