सस्नेह जय शिवराय….........
..........नितेश पाटील
#शिवप्रेमीगडयात्री
या धावपळीच्या जगात ना कुणाला जगायला वेळ आहे ना कुणाला उरायला..!! स्पर्धेपाई आयुष्य गमावून बसलेत सारे.काही अंशी जरी सोडले तरी. माणसातला माणूस विरळ झालाय. जसं करावं तसं भरावं म्हणतात ते योग्यच आहे.
जगायचा निखळ आनंद घ्यायचा असेल तर माणसाने सह्याद्रीच्या पर्वतरागांचा कणखरपणा, सौम्यपणा, ती झुंज, तो एकांत आणि त्यात बहरुन जाणं हे अनुभवायला हवं. आपल्याला निसर्ग अगदी भरभरून देत असतो. त्या निसर्गाची बीजं सह्याद्रीच्या पठारात खोलवर रोवलेली आहेत.आणि सह्याद्रीचा कल्पवृक्ष आजही तिथे खंबीरपणे उभा आहे. सर्वांची आवड वेगवेगळी असते यात दुमत नाहीच आहे.
त्या सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारे "श्री शिवछत्रपती शिवराय" आणि स्वराज्यासाठी मरणास तत्पर असलेले "निष्ठावंत मावळे". बाकी माझी गणती कशातही नाही.
आज माणूस म्हणवून घेण्याचीही लाज वाटावी अशी काही दुष्कृत्ये घडतात. आणि आपण कानाडोळा करतो.(काही अपवाद वगळता) जोपर्यंत आपल्या वाट्याला ती 'झळ' येत नाही तोपर्यंत आपण मुकाट्याने ते बघत असतो. फार तर हळहळत असतो. काही वेळेस इच्छा असूनही काही करता येत नाही तो भाग वेगळा. पण आज स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष सरूनही ही पारस्तिथी का निर्माण व्हावी हा चिंतनाचा विषय आहे. हे स्वतंत्र नव्हे. आजही सामान्य जनता वेठीस धरली जातेय. दडपणाखाली जगतेय. आपसूकच भीती हि आलीच. याला जबाबदार कोण..???? मीच का ???
महाराज्यांच्या कीर्तीचे सारेच गुणगान करतात आणि कारावयासही हवे. पण त्या किर्तिमागचा संघर्ष आपण बाजूला सारतो का..?? नसेलही पण त्या संघर्षातून मी काय धडे घेतो हा हि महत्वाचा प्रश्न आहे. संघर्ष सारेच करतात हो..!!! पण तो स्वस्वार्थासाठी नसावा.
शिवचरित्रातून काही शिकायचं असेल तर तीन प्रश्न स्वतःला विचारायला हवेत...१.आपण जन्माला का आलो..? २. आपण करतो काय..?? ३. आणि करायला पाहिजे काय...??? या तीन प्रश्नांची उत्तरं मला सापडली म्हणजे मी माणूस म्हणवून घेण्याचा आणि स्वतःला शिवभक्त म्हणण्याचा अधिकार मला आपसूकच येईल.
शेवटी दाखवणं,भासवणं वेगळं आणि आदर्श आत्मसात करून त्या प्रकारच आचरण करणं वेगळं. त्या तीन प्रश्नांच्या उत्तरातच माझं भवितव्य दडलेलं आहे हे हि एक निरंतर सत्य आहे.
बरं हे माझं वयक्तिक मत आहे. आणि आपली मतं इतरांवर लादू नये. पण ती इतरांना कळावी या मताचा मी आहे.
खीळ बसुनी म्यान व्हावे
नाही बोथट शौर्य तयांचे...
जगणे सोडून काय गातोस
घे निष्ठा नि आदर्श तयांचे....
........नितेश पाटील
९६३७१३८०३१
..........नितेश पाटील
#शिवप्रेमीगडयात्री
या धावपळीच्या जगात ना कुणाला जगायला वेळ आहे ना कुणाला उरायला..!! स्पर्धेपाई आयुष्य गमावून बसलेत सारे.काही अंशी जरी सोडले तरी. माणसातला माणूस विरळ झालाय. जसं करावं तसं भरावं म्हणतात ते योग्यच आहे.
जगायचा निखळ आनंद घ्यायचा असेल तर माणसाने सह्याद्रीच्या पर्वतरागांचा कणखरपणा, सौम्यपणा, ती झुंज, तो एकांत आणि त्यात बहरुन जाणं हे अनुभवायला हवं. आपल्याला निसर्ग अगदी भरभरून देत असतो. त्या निसर्गाची बीजं सह्याद्रीच्या पठारात खोलवर रोवलेली आहेत.आणि सह्याद्रीचा कल्पवृक्ष आजही तिथे खंबीरपणे उभा आहे. सर्वांची आवड वेगवेगळी असते यात दुमत नाहीच आहे.
त्या सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारे "श्री शिवछत्रपती शिवराय" आणि स्वराज्यासाठी मरणास तत्पर असलेले "निष्ठावंत मावळे". बाकी माझी गणती कशातही नाही.
आज माणूस म्हणवून घेण्याचीही लाज वाटावी अशी काही दुष्कृत्ये घडतात. आणि आपण कानाडोळा करतो.(काही अपवाद वगळता) जोपर्यंत आपल्या वाट्याला ती 'झळ' येत नाही तोपर्यंत आपण मुकाट्याने ते बघत असतो. फार तर हळहळत असतो. काही वेळेस इच्छा असूनही काही करता येत नाही तो भाग वेगळा. पण आज स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष सरूनही ही पारस्तिथी का निर्माण व्हावी हा चिंतनाचा विषय आहे. हे स्वतंत्र नव्हे. आजही सामान्य जनता वेठीस धरली जातेय. दडपणाखाली जगतेय. आपसूकच भीती हि आलीच. याला जबाबदार कोण..???? मीच का ???
महाराज्यांच्या कीर्तीचे सारेच गुणगान करतात आणि कारावयासही हवे. पण त्या किर्तिमागचा संघर्ष आपण बाजूला सारतो का..?? नसेलही पण त्या संघर्षातून मी काय धडे घेतो हा हि महत्वाचा प्रश्न आहे. संघर्ष सारेच करतात हो..!!! पण तो स्वस्वार्थासाठी नसावा.
शिवचरित्रातून काही शिकायचं असेल तर तीन प्रश्न स्वतःला विचारायला हवेत...१.आपण जन्माला का आलो..? २. आपण करतो काय..?? ३. आणि करायला पाहिजे काय...??? या तीन प्रश्नांची उत्तरं मला सापडली म्हणजे मी माणूस म्हणवून घेण्याचा आणि स्वतःला शिवभक्त म्हणण्याचा अधिकार मला आपसूकच येईल.
शेवटी दाखवणं,भासवणं वेगळं आणि आदर्श आत्मसात करून त्या प्रकारच आचरण करणं वेगळं. त्या तीन प्रश्नांच्या उत्तरातच माझं भवितव्य दडलेलं आहे हे हि एक निरंतर सत्य आहे.
बरं हे माझं वयक्तिक मत आहे. आणि आपली मतं इतरांवर लादू नये. पण ती इतरांना कळावी या मताचा मी आहे.
खीळ बसुनी म्यान व्हावे
नाही बोथट शौर्य तयांचे...
जगणे सोडून काय गातोस
घे निष्ठा नि आदर्श तयांचे....
........नितेश पाटील
९६३७१३८०३१

No comments:
Post a Comment