Friday, May 13, 2016

आपलं असतं का काही

#आपलं_असतं_का_काही
          ज्याप्रमाणे युद्ध म्हंटले कि त्यात बलिदान हे आलेच. एका मागून एक बलिदानाची शृंखला चालूच असते. त्याचप्रमाणे मनातील विचारांच्या युद्धात आपण आपल्याच (मिळवलेल्या) विचारांचे बलिदान प्रतिक्षण देत असतो जाणतेपणाने किव्हा नकळत...सांगायचा मुद्दा असा कि आपल्या मनात प्रतिदिन हजारोंच्या संख्येने विचार चालू असतात. ते सारेच विचार आपण प्रत्यक्षात उतरत नाहीत, उतरवू शकत नाही.
          त्यात असही होतं जर एखादा नवीन मुद्दा उपस्थित होतो तेव्हा त्या अनुषंगाने त्या दिशेने आपले विचार प्रवाहित होतात.आणि जुने विचार हवा होतात किव्हा शमून जातात. एकंदरीतच असं लक्षात येते कि माणसांच्या विचारांची वृद्धी होत असते आणि अंतही...
           पण माणूस स्वतःच्या विचाराने जगत नसतो. अर्थात तो आता हे मान्य करणार नाही. मुळात तो जन्मालाच स्वच्छ आणि निर्मळ पाण्याप्रमाणे आलेला असतो. त्याच्या बुद्धीला ज्ञानरूपी विचारांची भेसळ हि दिवसागणिक हळूहळू होत जाते. "पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिले वैसा" या उक्तीप्रमाणे सारं काही घडत जातं.
          या विश्वात विचार जन्मास आले कसे ते मला माहित नाही पण त्या विचारांच्या आधारावर आणि बांधणीवरच हे जग स्तिथ आहे. त्या विचारांच्या निर्मात्याचा मी कृतज्ञापूर्वक आभारी आहे. प्रत्येकजण त्या विचारांच चांगलं, वाईट भांडवल करून व्यक्त होत असतो. आणि त्या विचारांना आपलं समजत असतो. पण ते विचार मुळातच आपले नसतात. जर आपले असते तर सारे आपल्या आज्ञेत राहिले असते.
         आणि हेही एक सत्य आहे कि मनातील विचार हे समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांप्रमाणे असतात, त्यांना अंत नाही. पण मनात विचारांच्या लाटा उसळत असतील, उत्पन्न होत असतील तर त्या लाटा उत्पन्न करणाऱ्या शक्तीबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे.
...नित

Tuesday, April 26, 2016

पाणी वाचवा दोन महिने ?

पाणी वाचवा दोन महिने ?

     एक म्हण प्रचलित आहे. "आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार ?"  परिस्तिथी आज वेगळी नाही.
आज महाराष्ट्राच वैभव म्हणावं तर साडेतीनशे मैल लांबीची पर्वत शृंखला सह्याद्री. जिथे शिवछत्रपतींनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं. त्यावेळी निष्ठावंत माणसे होती हे राजांचं वैभव होतं. आज परिस्तिथी वेगळी आहे. त्या सह्याद्रीच्या कुशीत उगम होणाऱ्या नद्यांनी महाराष्ट्र सुजलाम,सुफलाम केला आणि करत आहेत. निसर्गाचं चक्र थोडंस विस्कळीत झालंय हे मान्य..!! पण त्याला जबाबदार कोण ? माणूसच ना ?
       पूर्वी महाराष्ट्राची लोकसंख्या आजच्या तुलनेत किती होती ? आज माणसं वाढली पण निसर्ग तोच आहे ? पैकी कमी झाला आहे. तो निसर्ग वाढविण्यासाठी, निदान जसा आहे तसा ठेवण्यासाठी माणसांनी किती प्रमाणात प्रयत्न केला ? आज सुशिक्षित, अत्याधुनिक माणसाने निसर्गाची कदर किती केली ? कोंक्रेटच निर्जीव,कृत्रिम जंगल उभं करण्यासाठी किती सजीव जंगलांची/झाडांची कत्तल केली ? त्या कोंक्रेटच्या जंगलामुळे वाढत्या प्रदूर्षणास जबाबदार कोण ? या दुष्काळास जबाबदार कोण ? या साऱ्यांचं उत्तर म्हणजे निश्चितच माणसात लपलेला स्वस्वार्थ. स्वार्थापाई बहुतांशी माणसं दिसत असूनही आंधळी झालीत हे नाकारता येणार नाही.
       वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता पावसाचं पाणी आणि नद्यांच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन झाल्यास महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्यावाचून राहणार नाही. आज एकंदरीत विचार करता दुष्काळी क्षेत्रात सरकार, सामाजिक संस्था, व इतरही अशी बरीच माध्यमं आहेत जी आपापल्या परीने दुष्काळग्रस्तांना मदत करते. ते उल्लेखनीय आहेच. पण आजही महाराष्ट्रात ज्या भागात पावसाळ्यात नद्यांचं पाणी ओसंडून वाहत जाते आणि समुद्रास मिळते. ते पाणी तहानलेल्या नद्यांपर्यंत पोहचवण्याचा मार्ग अजून का तयार झालेला नाही..? दुष्काळी भागात फक्त आणि फक्त पाण्याची गरज असूनही नद्या जोडण्याचा प्रकल्प अजून हाती का घेतला गेला नाही..? असे बरेच प्रश्न मनात घर करून जातात...
       पाणी वाचवा, पाणी जिरवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा या घोषणा अजूनही प्रखरतेने फक्त मार्च आणि मे महिन्यातच का दिल्या जातात. उर्वरित महिन्यांत त्याचा विचार तितक्या प्रखरतेने केला जात नाही. आभाळ फाटल्यावर ढिगळ लावत सुटण्यात काय अर्थ आहे.निश्चितच या साऱ्यांचा विचार करण्याची आज गरज आहे. पण वेळीस सावरेल तो माणूस कसला ?
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)९६३७१३८०३१

Friday, April 15, 2016

मंदिर-पेहराव-बंदी

====मंदिर-पेहराव-बंदी++++
        प्रत्येक जागेचे एक पावित्र्य आहे मग ते मंदिर, मस्जिद, चर्च अथवा कोणत्याही धर्माचे असू दे सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असे वागावे कि तेथे बंधन घालण्याची गरजच पडू नये.
        आपण वैदिक संस्कृती जपणारे लोक आहोत. तीर्थक्षेत्री अथवा मंदिरात दर्शनाला येताना तुम्ही काय कपडे घालून येता या पेक्षा तुमचे मन इथे शांत होतंय का ? विचलित तर होत नाही ना ? मन:शांती मिळतिये का ? भगवंत दर्शनाची आस लागतीये का ? हे पाहणे गरजेचे आहे.
      आपली भारतीय पोशाख - मग ते मराठी, बंगाली, पंजाबी असू किव्हा आणखीन कुठली, खूप चांगली होती. अंग झाकून जाणारी. आता ती फारशी तशी उरली नाही. असो काळानुसार सारं बदलत असतं.
       पण सांगायचा मुद्दा असा आहे कि ऑफिस मध्ये ड्रेस कोड चालतो, शाळेत चालतो, असे बरेच विभाग आहेत तिचे पेहराव हा पूर्व निर्धारित असतो. तर मग मंदिरात का नको ? नसेल जमत तर जाऊ नये. प्रत्येकाच्या ह्रुदयात असतोच कि...भगवंत. मंदिर काही पिकनिक ची जागा नाही. त्या उद्देशाने तिचे जाणेही चुकीचे आहे. कुठे काय करावं याची जाण ज्याची त्याला असायला हवी.
         पण मंदिर हि भगवंताविषयी व जीवनाविषयी चिंतन करण्याची जागा आहे. तिथे वर्षानुवर्षापासून भक्तगणांनी आपल्या पारंपारीक, सांस्कृतिक, निस्सीम, भाबड्या भक्तीने एक अदृश्य शक्ती स्थापित केलेली आहे. जी त्यांना जगण्याचं सामर्थ्य देत असते. तिथे त्यांचं मन विचलित होईल असं कुणी वागू नये.
      देवाधर्माच्या गोष्टी तरी व्यक्तिगत स्वातंत्र्यातून सोडाव्यात. देवदर्शनाला जाताना काय हरकत आहे जर आपल्या परंपरागत पोशाखात जावे लागले तर ? मनोरंजनाची स्थळं आणि सार्वजनिक स्थळं यात गफलत का करावी ? त्याही पुढे जाऊन म्हणायचं झालं तर मी बेडरूम मध्ये जसा वावरतो तसा ओटीवर वावरू शकत नाही. शेवटी काही गोष्टीना मर्यादा असतात. त्या स्वतःवर ओढवून घेऊ नये इतकचं...
       सर्वात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या भारतवर्षात आपण राहतो. तिथली संस्कृती जपणे आपले कर्तव्य आहे. आता समाज उच्चशिक्षित झाल्याकारणे काही रूढी, परंपरा भुलचट वाटत असतील. पण सार्वजनिक ठिकाणी, मंदिरात पारंपरिक पेहरावात जाणे यात काय वावगं असू शकतं ? उगाच विरोध करायचा म्हणून कोणी करू नये. हा एक प्रश्न सोडला तर त्या व्यतिरिक्त सारे प्रश्न निकालात निघाले अस नाही.
         आणि ईश्वर देवघरात, मंदीरात किव्हा अन्यत्र असा कुठेच नाही. त्याला जिथे तुम्ही शक्तिरुप दिलं तिथे तो निश्चितच आहे. तुम्ही त्याची भक्ती कोणत्या प्रकारे करता, तुमचं आचरण काय यावर सारं काही अवलंबून असतं. आज त्या ईश्वरनिगडीत काही गोष्टींवरून रान उठवलं जातं, आणि त्यात सामान्य माणसं भरकटली जातात हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या ह्रुदयात ईश्वर आहे तो आधी जणाला पाहिजे, जोपासला पाहिजे. त्या पद्धतीच आचरण केलं पाहिजे तरच तुम्ही माणूस म्हणून श्रेष्ठ व्हाल...अन्यथा सारं व्यर्थ आहे.
.....नितेश पाटील (धनसार,पालघर)

Thursday, April 14, 2016

खारीचा वाटा

खारीचा वाटा
काळ बदलतोय, वेळ बदलतेय
जागृत होतोय, माणसातला माणूस
पुन्हा त्याच ओघाने, माणुसकीच्या दिशेने
अंधार पुसत चालला, स्वयंप्रकाशी माणूस...
...नित
         प्रत्येक माणसात माणूस दडलेला आहे. सध्या बहुतांशी माणसं स्वतःमध्ये गुंतल्यामुळे त्यांना त्याच भान राहिलेलं नाही. पण मीपणा सोडून जगणारीही माणसं भरपूर आहेत. जे स्वतःबरोबर इतरांचाही विचार करतात, वेळीस आपलं सर्वस्व झोकून देतात.... त्यात निदान आपला खारीचा वाटा तरी असायला हवा. शेवटी कितीही ऐश्वर्य कमावलं तरी ते इथेच राहणार. सोबत नेता येणार नाही आणि परतूनही कोणी येत नाही.
          आजची परिस्तिथी जरा वेगळीच दिसते. पूर्वी माणसं जगण्यासाठी कमवायची, आता कमावण्यासाठी जगतात. माणूस आजकाल आपल्या मिळकती पेक्षा जास्त खर्च करतो. त्यामुळे तो त्याच्याच दुनियेत मशगुल असतो. दुसऱ्याच हित-अहीत, सुख-दुःख जरी जाणत असला तरी परिस्तिथी पुढे त्याला काही जमत नाही. पण त्यातूनही समाजहितासाठी आपण काहीतरी करावं हि भावना जोपासणारीही माणसं आहेत.      स्वतःसाठी तर सारेच जगतात थोडंस का होईना इतरांसाठी जगून पहावं. आपलाही हातभार सत्कर्मासाठी खारीच्या वाट्याइतका तरी लागावा. जेणेकरून माणसांच्या पंगतीत आपल्याला बसता येईल. असो....
          तर खारीचा वाटा म्हणजे नेमके काय? रामायणात खारीची कथा आपण वाचतो. सेतू पूल बांधत असताना दगड उचलू न शकणारी खार मातीत लोळून अंगाला माखलेली माती पुलाजवळ आणून टाकत असते व आपल्या क्षमतेनुसार श्रमदान करत असते. तिचे श्रम पाहून भारावून गेलेले श्रीराम आपली तीन बोटे तिच्या पाठीवर फिरवतात. ती बोटे आजही आपण खारीच्या पाठीवर पाहतो. सद्गुरूंचा कृपाहस्त आणि त्यांनी दिलेली कौतुकाची थाप अशीच कायम पाठीवर राहते. फक्त आपण प्रयास करायला हवे.
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)

Tuesday, April 12, 2016

झाडे वाचवा

झाडं वाचवा
         माणसात आणि झाडांत काय फरक आहे. मुळात झाडं आहेत म्हणून माणसं आहेत. पण किती माणसं तसा विचार करतात ? कमीच...  आज माणूस माणसाचा विचार करत नाही तो झाडाचा काय करणार म्हणा ?  आज शहरात नवनिर्माण करण्यासाठी रस्त्यांवरील झाडे मोठया संख्येने तोडली जातात. शहरापर्यंत ठीक होतं पण शहरातील उपनगरातही हे प्रमाण भयंकर वाढलंय. काही गोष्टींना मर्यादा असते. तिचं उल्लंघन केलं कि सारं असूनही नसल्यासारखी परिस्तिथी निर्माण होते. कृत्रिम आणि नैसर्गिक यात उच्च प्रतीची तफावत असते हे विसरून चालणार नाही. निसर्गाने जे आपल्याला भरभरून मोफत दिलंय त्याचा मोबदला देता येत नसेल तर निदान ते टिकवायची तरी आपली द्यानत असली पाहिजे.
        सुशोभीकरण, रस्ते, शहरी विकास या साऱ्यांची गरज असली तरीही त्यापेक्षा जास्त झाडांची गरज आहे हे माहित असूनही माणसं अशी का वागत असावीत याचं उत्तर मला काही सापडत नाही. म्हणजे माहित असते विहीर कोरडी पडली आहे... तरी त्यात उडी घ्यायची. पण म्हणून काय नुकसान विहिरीचं होनार आहे का ? आपलंच होईल. त्याआधी त्या विहिरीत पाणी कसं जमा होईल याचाही विचार करायाला हवा. वृक्षतोडीची भरपाई करणेही गरजेचे आहे.
           निसर्गाचा जर आपण हळू हळू का होईना... लचका तोडत गेलात तर पुढे ओढवणारी परिस्तिथी खूप भयंकर असेल. आपल्या दृष्टीने आपण दोन, चार झाडं तोडत असू पण एकंदरीत जर विचार केला तर सर्यांमिळून किती झाडं तोडली जातात आणि वृक्षारोपण किती होते. हा हि विचार करणे गरजेचे आहे.
         आणि एक बरं आहे. झाडांना भावना असल्या तरी त्या मूक आहेत. तात्काळ प्रतिकारात्मक शक्ती त्यांच्याकडे नाही. ते कधी ईर्षा धरत नाही..!! झाडांप्रतिही नाही न् आपल्या प्रतीहि नाही.
समजा त्यांनीही ठरवलं...
आपण माणूस म्हणवणाऱ्यांसारखं वागायचं तर...?
त्यांनीही बंड करून संप पुकारला तर...?
प्राणवायूची निर्मिती थांबवली तर...?
सारीच फुले दुर्गंधी झाली तर...?
सारीच फळे विषारी झाली तर...?
       अशा कैक प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही आम्ही सारेच सजीवगण निर्जीव म्हणून पडतील नाही...? आणि एकंदरीत साऱ्यांनीच विचार करायला हवा कि आज जे सृष्टीचं कालचक्र  बिघडलं आहे त्याला कारणीभूत कोण ?
विनामूल्य दिले आम्हां निसर्गाने
टिकवू निदान ते जगण्यासाठी
संकल्प वृक्षारोपणाचा घेऊ हाती
समतोल सृष्टीचा राखण्यासाठी
...नित
नितेश पाटील(धनसार,पालघर)

Thursday, March 17, 2016

ग्रामपंचायत आणि कलम

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.    ग्रामपंचायत 
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.
ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :
१. भूविकास
२. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
३. जमिनीचे एकत्रीकरण
४. मृदुसंधारण
५. लघु पाट बंधारे
६. सामाजिक वनीकरण
७. घर बांधणी
८. खादी ग्रामोद्योग
९. कुटिरोद्योग
१०. रस्ते, नाले, पूल
११. पिण्याचे पाणी
१२. दळण वळणाची इतर साधने
१३. ग्रामीण विद्युतीकरण
१४. अपारंपरिक उर्जा साधने
१५. दारिद्रय निर्मुलन
१६. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
१७. बाजार आणि जत्रा
१८. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
१९. महिला आणि बालविकास
२०. प्रौढ शिक्षण
२१. सांस्कृतिक कार्यक्रम
२२. सार्वजनिक वितरण
२३. उत्पादनाच्या बाबी
✅ग्रामपंचायतींची कार्ये:
१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते
आय पी सी (IPC) १८६०
कलम १४- शासकीय सेवक
कलम २१ -लोकसेवक
कलम २२- जंगम मालमत्ता
कलम २३ -गैर्लभ किंवा गैर्हानी 
कलम २४ -अपप्रमनिक्पने
कलम २५ -कपतिपनने
कलम २६- समजण्यास कारण
कलम २८- बनवतीकर्ण किंवा नकलीकरन
कलम २९- दस्त्ताइवज
कलम २९ (अ) -वीदूत नोंदी
कलम ३० -मुल्य वान रोखा
कलम ३३ -कृती अकृती
कलम ३४- सामाईक इरादा
कलम ३९ -आपखुशीने कींवा इचापुर्वक
कलम ४० -अपराध
कलम ४१- वी शे श  कायदा
कलम ४२ -थानीक कायदा
कलम ४४ -श ती / हानी
कलम ५२ -सद्भावनेने / शुद्ध हेतूने
कलम ५२ (अ) -आसरा देणे
                   आपवाद
कलम ७६ -कायदेशीर बांधील असलेल्या        व्यक्तीने आथवा तथ्ये विषयक चुक्भूलीमुळे केलेली कृती अपराध होत नाही
कलम ८२ -सात वर्ष वयाखालील बालकाने केलेली कृती
कलम ८३ -सात वर्षावरील व बारा वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती आसलेल्या बालकाने केलेली कृती
कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेली गोष्ट
कलम ९७ -शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क
कलम १०० -शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृतु घडून आणण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०१ -आसा हक्क मृतुहून अन्य अपाय करण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०२-शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरु होणे व चालू राहणे
    
             अप्प्रेर्णा वीषयी
कलम १०७- एखा द्या गोष्टीचे अप्प्रेरन
कलम १०८- अप्प्रेरक
कलम १०९- अपप्रेरणामुळे परीणामतः
कलम ११४- अपराध घडला तेंव्हा अपप्रेरक हजार आसने
     सार्वजनीक प्रशान्त्तेच्या वीरोधी अपराधा वीषयी
कलम १४१- बेकायदेशीर जमाव
कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक आसने
कलम १४३- शीक शा
कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासः बेकायदेशीर जमावात सामील होणे
कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश झाल्याचे माहीत असूनही सामील होणे
कलम १४६- दंगा करणे
कलम १४७- दंगा करण्याबद्दल शी शा
कलम १४९- वीधी नी युक्त  जबाबदारी
कलम १५१- पाच कींवा आधीक व्यक्तींना पंग्न्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक थांबून राहणे
कलम १५३(अ) -धर्म,वंश,जन्म्थन,नीवास भाषा इ. कारणावरून नीरनीराळया गटामध्ये शत्त्रुतव वाढवणे
कलम १५९- दंगल
कलम १६०- दंगल करण्याबद्दल शीकशा
       लोक्सेवाकांकडून कींवा त्यासबंधी घडणाऱ्या अप्राधावीशइ
कलम १७०- लोक्सेव्काची बतावणी करून  तोत्यागीरी करणे
कलम १७१-लोकसेवक वापरतो तशी वर्दी कींवा ओळख चींह कपट  करण्याच्या उद्देशाने वापरणे, परीधान करणे
         लोक्सेव्कांच्या कायदेशीर   प्रधीकाराच्या अव्मानावीश इ
कलम १७२- समन्सची बजावणी  कींवा इतर कार्येवाही टाळण्यासाठी फरारी होणे
कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर श्प्तेव्र खोटे कथन करणे
कलम १८८- लोक्सेव्काने जारी केलेल्या आदेशाची अव्दन्या करणे
        खोटा पुरावा आणी सार्वजनीक न्यायाच्या वीरोधी अपराध
कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा करणे कींवा खोटी माहीती देणे
कलम २२३- लोक्से
व्काने हयग इने बंदीवासातून कींवा ह्वाल्तीतून पळून जाऊ देणे
          सार्वजनीक आरोग्य,सुरक्षीतता सोय सभ्यता व नीतीमत्ता याना बाधक अशा अप्रधान्वीशइ
कलम २७९- सार्वजनीक रस्त्यावर बेदकारपणे वाहन चालवणे
कलम २९२- अश्लील पुस्तके इ. वी करी करण

        ध्म्स्बंधीच्या अप्रधान्वी श इ
कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे नुकसान करणे कींवा ते अप्वीत्र  करणे
कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा कींवा धार्मीक श्रद्धांचा अपमान करून धार्मीक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने कृती करणे
कलम २९८- धार्मीक भावना दुखवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शब्द उच्चारणे
       मानवी शरीरास व जीवीतास बाधक होणार्या अप्रधावी श इ
कलम २९९- सदोष मनुष्यवध
कलम ३००- खून
कलम ३०२- खुणा बद्दल शी क्षा
कलम ३०४- सदोष मनुष्यवधा बद्दल शी क्षा
कलम ३०४(अ)- ह्य्ग्यीने मृतू स कारण
कलम ३०४(ब)- हुंडा बळी
कलम ३०६- आत्म्हत्तेला अपप्रेरणा देणे
कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे
कलम ३२३- इच्छापुर्वक दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शी क शा
कलम ३२४- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहच्व णे
कलम ३२५-  इच्छापुर्वक  जबर दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शी क शा
कलम ३२६- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहच्व णे
कलम ३२६(अ)- असीड इ चा वापर करून  इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे
कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक असीड फेकणे अथवा फेकण्याचा प्रयत्न करणे
कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने वीष इ सहायाने दुखापत करणे
कलम ३३०- कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी , गेलेला  माल परत घेण्यासाठी  इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम ३३२- लोक्सेव्काला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम ३३६- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणारी कृती
कलम ३३७- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने दुखापत पोचवणे
कलम ३३८-  इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने जबर  दुखापत पोचवणे
कलम ३३९- गैर नीरोध / आन्यायाने प्रतीबंध
करणे
कलम ३४०- गैर प्रीरोध/ आन्यायाने कैदेत ठेवणे 
कलम ३४१- गैर नीरोधाबद्दल शी कशा
कलम ३४२- गैर परीरोधाबद्दल शी कशा
कलम ३४९- बलप्रयोग
कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग
कलम ३५१- हल्ला / हाम्ला
कलम ३५२-  फौजदारी पात्र बलप्रयो गाबद्दल शी कशा
कलम ३५३-  लोक्सेव्काला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४- शीरी चा वी न्य्भंग करण्याच्या उद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४(अ)- लैंगीक छ ळ व च छ लाब्द्द्ल  शीक्षा
कलम ३५४(ब)- शीरीला वी वस्र करण्याच्याउद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४(क)- चोरून अश्लील चीत्र्ण करणे
कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे
कलम ३५९- अप्ण्य्न /मनुश चोरून नेणे
कलम ३६२- अपहरण /प्ल्वुन नेणे
कलम ३६३- अप्ण्य्नाब्द्दल शी कशा
कलम ३७०- व्यक्तींचा अप्व्यापार करणे
कलम ३७५- बलात्कार
कलम ३७६- बलात्काराबद्दल शी कशा
कलम ३७७- अनैस्गीक सन्भोक
कलम ३७८ चोरी
कलम ३७९- चोरीबद्दल शी कशा
कलम ३८०- राहते घर वगैरे ठीकाणी चोरी कलम ३८३- ब्लाद्ग्रह्न /जुल्माने घेणे
कलम ३८४ - ब्लाद्ग्रह्नाब्द्दल शी कशा
कलम ३९०- जबरी चोरी
कलम ३९१- दरोडा
कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शी कशा 
कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयतन करणे
कलम ३९५- दरोड्याबद्दल शी कशा
कलम ३९९- दरोडा घालण्याचा प्रयतन करणे
कलम ४०५- फौज्दारीपात्र न्यास्भंग /विस्वास्घत
कलम ४०६- न्यास्भनगाब्द्दल शीक शा
कलम ४०९- लोक्सेवाकाने ,सावकार ,ए जंत यांनी आन्यायाने वी सवासघात करणे
कलम ४१०- चोरीची मालमत्ता
कलम ४११- अप्रमानीकपणे चोरीची मालमत्ता  स्वीकारणे
कलम ४१५- ठक्वणूक
कलम ४१७- ठक्वणूक करण्याबद्दल  शीक शा
कलम ४२०- ठक्वणूक करणे आणी मालमत्ता देण्यास नकार देणे
कलम ४२५- अप्कीर्या
कलम ४२६- अप्किर्य बद्दल  शीक शा
कलम ४३५- शंभर रुपये पर्यंतच्या कींवा शेतमालाचा १० रु की मतीच्या नुकसान करण्याच्या उद्देशाने स्पोटक पदार्थ अथवा वीस्तव याद्यारे आगळीक करणे
कलम ४४१- फौजदारी पात्र अतीक्रमण कींवा अन्यायाची आगळीक
कलम ४४२-गृह अतीक्रमण कींवा घरा वीषयी आगळीक
कलम ४४३- चोरटे गृह अतीक्रमण
कलम ४४४- रात्रीच्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण करणे
कलम ४४५- घरफोडी
कलम ४४७- फौजदारी पात्र अती क्रमनाबद्दल शी कशा
कलम ४४८- घर अती क्रमनाबद्दल शी कशा
कलम ४५२- दुखापत ,हमला ,गैर्नीरोध ,करण्याची प्रुव तयारी करून नंतर गृह अतीक्रमण करणे
कलम ४५४- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम ४५७- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्री
च्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम ४६३- बना वटी करण
कलम ४६५-  बना वटी कर नाबद्दल शी कशा
कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी  बना वटी करण करणे
कलम ४९८(अ)- ए खांद्या सी रीच्या पतीने कींवा नातेवाईकाने तीला क्रूर वागणूक देणे
कलम ५०४- शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे
कलम ५०६- फौज्दारीपात्र धाक्दप्त्शा बद्दल शी कशा
कलम ५०९- वी न्य्भंग करण्याच्या उद्देशाने हावभाव कींवा शब्दोचार करणे
कलम ५११- आजीवन कारावासाच्या कींवा अन्य कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा.
    .....  जनहितार्थ
संग्रहित
,

Monday, February 22, 2016

गिर्यारोहन (ट्रेक) चे नियम

शिवप्रेमी गडयात्री ट्रेक समूह नियम

🚩 सस्नेह जय शिवराय 🚩
⛳ शिवप्रेमी गडयात्री ⛳
ट्रेक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आनंदसह माहितीचा स्रोत आहे, धकाधकीच्या जीवनात निसर्गाशी नाते जोडणारा एक उत्तम दुवा आहे, कट्ट्याच्या निमित्ताने हा दुवा जपता येतो, गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो.     चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक हा समूह निर्माण केला आहे. शिवप्रेमी गड यात्री...
      ट्रेकिंगला जाताना काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत.
* प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत.
* मोठ्या आवाजात बोलू नये.
* चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत.
* बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.
* कुणीही चुकीचं वर्तन करू नये.
* टीम लिडरने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करणे.
* ट्रेकला जाताना व्यसन करू नये.(मद्यपान,अल्कोहोल,ई.) नाहीच राहवत असेल तर येऊच नये.
* ट्रेकचे निर्धारीत मानचिन्ह असलेल्या कुठल्याही वस्तू ,कपडे शक्यतो ट्रेक व्यतिरिक्त कुठेच वापरू नयेत
* ट्रेकिंगला म्हणून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या सॅकमध्ये फर्स्ट एड बॉक्स (यामध्ये तुम्हाला लागणारी औषधे असावीत), खाण्याचे कोरडे साहित्य (चिवडा, लाडू, ठेपले थोडक्यात ज्या वस्तू टिकू शकतील असे.), प्लॅस्टिक बॅग्ज, साखर, मीठ, छोटी बॅटरी,त्यासाठी आणि कॅमेरा सोबत नेणार असाल तर त्यासाठी लागणारे सेल, पाण्याच्या दोन बाटल्या आणि सर्वात महत्त्वाचं एक कपडय़ाचा जोड,स्लिपर आणि रोप. या सर्व गोष्टी एक प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित रॅप करून सॅकमध्ये असावेत. अथवा ज्या समूहाबरोबर आपण जाणार असाल त्यांनी आवश्यक ती साधने, उपकरणे सोबत घेतली आहेत ना याची खातरजमा करून घ्यावी.
* ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे जाताना रुळलेल्या वाटेवरूनच शक्यतोवर जावे. पावसाळ्यात नवीन मार्ग शोधण्याचे साहस करू नये.
* ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंग पँट, आणि पूर्ण बाहय़ाचा शर्ट घाला. मुलींनीही कॉटनचे कपडे न घालता ओले झाल्यानंतर पटकन वाळू शकतील, असे कपडेच घालावेत. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पायात चांगल्या प्रतीचे सॉक्स आणि ट्रेकिंग शूजच घाला. दागिने घालणे टाळा.
* तुमच्याकडे त्या ठिकाणी चालणारया नेटवर्कचा मोबाईल अवश्य जवळ असणे गरजेचे आहे. ट्रेकला जाण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच त्यांचा नंबरही सोबत ठेवावा. ट्रेक दरम्यान एखादी अडचण निर्माण झाली तर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
* धबधब्याच्या किंवा एखाद्या नदीच्या पात्रात डुंबायला जाता तेव्हा पाण्याचा अंदाज खूपच महत्त्वाचा असतो. तुम्हांला जर पोहोता येत नसेल तर खोल पाण्यात जाणे टाळा. पाण्यात गेल्यावर वेळेचे भान रहात नाही. पावसाळ्यात नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असल्याने पात्रात खोलवर जाणे टाळा. तुम्ही जिथे आहात तिथे पाऊस नसेल पण लांबवर पडणा-या पावसामुळे पाण्याची पातळी कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते.
* उंचावरून कोसळणारा धबधबा प्रत्येकालाच आकर्षति करत असतो. पण या धबधब्यांमधून लहान मोठे-दगड येण्याची शक्यता असते. वरून येणारा लहानशा दगडामुळेही इजा होण्याची शक्यता असल्याने अशा धबधब्यांखाली खाली उभे राहणे टाळा.
* पावसाळ्यात धबधब्यांमध्ये रॅपिलग करताना यामध्ये धोका असतो हे लक्षात असू द्या. प्रत्येक रॅपिलग झाल्यावर दोर चेक करायलाच हवा. रॅपिलग करणा-याला हेल्मेट घालणे बंधनकारक असते तो नियम काटेकोरपणे पाळावा.
* निसर्गाचे सौंदर्य कॅम-यामध्ये टिपत असताना वेळेचेही भान असू द्या. एखाद्या अवघड जागी उभे राहून फोटो काढणे, दंगामस्ती करणे टाळावे,तसे करणा-यांना त्यापासून प्रवृत्त करावे.
* ज्या ठिकाणी जाणार आहात तिथल्या स्थानिक गावक-यांची कधीही मदत लागू शकते हे ध्यानात घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागा. जर गावाबाहेर किल्ल्यावर तुम्ही जाणार असाल आणि तिथे जर तुम्ही वास्तव्य करणार असाल तेव्हा गावातील काही लोकांचे दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, तिथल्या पोलिस ठाण्याचा क्रमांक जवळ ठेवा. शक्य झाल्यास तिथल्या एखाद्या गावकऱ्याला तुमच्यासोबत न्या.
* तुमच्या ट्रेकिंगमध्ये एका रात्रीचा मुक्काम असेल तर सोबत कॅरीमॅट, ओडोमॉस, शक्य असेल तर स्लििपग बॅग बाळगा. तसेच रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर त्या ठिकाणची स्वच्छता अवश्य ठेवा.
* ट्रेकिंगच्या दरम्यान तुमच्याकडे असलेला कचरा, खाद्यपदार्थाची वेष्टणे, फळांची साले, थंड पेयांचे डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद,निरुपयोगी वस्तू इकडेतिकडे फेकू नका. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा.
* ट्रेक संपल्यानंतर ओले झालेले बूट, सॉक्स काढून ते सोबत असलेल्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत आणि पाय कोरडे करून स्लिपर घालाव्यात.
ट्रेकिंगला निघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्षमता ओळखूनच ट्रेकिंगला/फिरायला जाण्याचे ठिकाण निवडावे.
* तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असाल तर आधी एका दिवसाच्याच ट्रेकला जा आणि अनुभवी व्यक्तीं/ ग्रुप्स सोबतच जा. जर मित्रमंडळींच्या ग्रुपबरोबर जाणार असाल तर गावातील स्थानिक व्यक्तीला वाटाडय़ा म्हणून सोबत घ्या.
* ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तिथले मार्गाची माहिती असावी, सोबत त्या भागाचे नकाशे असावेत. त्यामुळे परतीच्या मार्गात जर काही अडचण आली तर पर्यायी रस्ता वापरता येऊ शकतो.
संग्रहित...
धन्यवाद....
संकलन :- नितेश पाटील (पालघर,धनसार)
मोबाईल नं. ०९६३७१३८०३१
email :- nitesh715@gmail.com