Friday, February 12, 2016

सलाम


सलाम

का हळहळतो माणूस
शूर वीरांप्रती
ते शौर्य तसे असते...
ध्यास एकच मनी
रक्षण सिमेचे
ती जिद्द तशी असते...
शान राखण्याची
तिरंगा जपण्याची
रक्त सळसळत असते...
हिम पर्वताच्या कुशीत
उणे तापमान जरी
जाणीव फक्त असते...
शत्रू संपवण्याची
विना ऑक्सिजन
ज्योत तेवत ठेवण्याची
माणसात एकटा पडतो इथे माणूस
जिथे बर्फा खेरीज
न कसलं अस्तीत्व
तिथे सामर्थ्य एकट्याच...
रक्षीतो आपणासी निर्जन राहून
बंध राष्ट्र भक्तीचे
वेड देश प्रेमाचे..
साथ काळाची असते
काळच घात करतो
धवल बर्फाचा पर्वत
अचानक कोपतो
कवेत घेतो
राष्ट्रभक्तांस
काय गुन्हा ??
तो इतका निर्दयी होतो
जो भोगतो त्यालाच जवळ घेतो
पांघरून बर्फाच त्यांस देतो
तरीही हारत नाही
संघर्ष करतो
एका जिद्दीनं, उर्मीनं
पण दैवापुढे नाही चालत काही
खुजे ठरतो आपणही
भारत मातेचा सच्चा सुपुत्र
लाख मरणे मागे टाकून
शेवटी शहीद होतो...
सलाम त्या संघर्षास...
सलाम त्या वीर मरणास...
सलाम त्या धरणी पुत्रांस...
सलाम त्या मरून जगणाऱ्या शूरांस
सलाम, सलाम आणि सलाम.....
जय हिंद....
नितेश पाटील(पालघर,धनसार)

No comments: