सस्नेह जय शिवराय
माझे जगात काहीच नसताना मी जे काही मिळविण्याचा प्रयत्न करत असतो ते मिळविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागणार. तो तर चुकणार नाही. पण ज्या मायापित्यांनी आपल्याला अथक परिश्रमातून, संघर्ष करून, संघर्ष करण्याच्या लायकीचे बनवले.आपल्याला आपल्या पायावर उभं केलं. या निसर्गानेही आपल्याला भरभरून दिल.आज त्यांचीच हेळसांड झालेली समाजात आपल्याला पाहायला मिळते.
पण एक लक्षात घेतलं पाहिजे जमीन कितीही सुपीक असली, बीज कितीही दर्जेदार असलं तरी त्या शेतकऱ्याचे अथक परिश्रम, त्याने केलेली मशागत, आणि निसर्गाची असलेली पूरक अशी साथ हे विसरता कामा नये .ते बीज जमिनीतून बाहेर येण्यापर्यंतचा आणि बहरण्यापर्यंतचा जो संघर्ष असतो त्या संघर्षाची जान फक्त त्या मायरूपी पालकांस असते. ते जीवाच्या आकांताने त्यावर फुंकर घालत असतात. त्याला ते एक विश्व बहाल करत असतात.
पण आज बऱ्याच जणांना त्यांची कदर उरलेली नाही. अश्यानी एकदा आपल्या आजूबाजूला आवर्जून पहावं. ज्यांचे आईवडील नाहीत त्या अनाथांच्या जीवनात एकदा झाकून पहावं त्यांनी काय गमावलय आणि तुम्ही काय मिळवलंय याची अनुभूती येईल..
पहावं जाऊन ते माणसांनी फुलवलेले बगीचे जे एका लयीत शिस्तबद्ध पद्धतीने बहरून जनमानसात प्रतिक्षण नवचैतन्य निर्माण करत असतात.
पाहावे ते निसर्ग सानिध्यात वाढलेले अस्तव्यस्त अफाट उंचीचे, गर्द दाटीचे भयाण जंगल. डोळ्यास सुखावत असले, आपणास पोषक असले तरी माणसं सहजासहजी तिकडे फिरकत नाहीत.
पहावं त्या दुष्काळ ग्रस्त भागात जाऊन... निसर्ग जेव्हा रुसतो तेव्हा काय परिस्तिथी निर्माण होते. आणि आजही काय भोग भोगावे लागतात.
म्हणूनच माणसांनी माणसा सारखे माणसात राहावे. आपाल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे कि आपल्याला जन्म देणाऱ्या आणि ज्या निसर्ग सानिध्यात आपण वाढतो त्याची कदर आपण केली पाहिजे.
.....नितेश पाटील ( धनसार)
९६३७१३८०३१
माझे जगात काहीच नसताना मी जे काही मिळविण्याचा प्रयत्न करत असतो ते मिळविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागणार. तो तर चुकणार नाही. पण ज्या मायापित्यांनी आपल्याला अथक परिश्रमातून, संघर्ष करून, संघर्ष करण्याच्या लायकीचे बनवले.आपल्याला आपल्या पायावर उभं केलं. या निसर्गानेही आपल्याला भरभरून दिल.आज त्यांचीच हेळसांड झालेली समाजात आपल्याला पाहायला मिळते.
पण एक लक्षात घेतलं पाहिजे जमीन कितीही सुपीक असली, बीज कितीही दर्जेदार असलं तरी त्या शेतकऱ्याचे अथक परिश्रम, त्याने केलेली मशागत, आणि निसर्गाची असलेली पूरक अशी साथ हे विसरता कामा नये .ते बीज जमिनीतून बाहेर येण्यापर्यंतचा आणि बहरण्यापर्यंतचा जो संघर्ष असतो त्या संघर्षाची जान फक्त त्या मायरूपी पालकांस असते. ते जीवाच्या आकांताने त्यावर फुंकर घालत असतात. त्याला ते एक विश्व बहाल करत असतात.
पण आज बऱ्याच जणांना त्यांची कदर उरलेली नाही. अश्यानी एकदा आपल्या आजूबाजूला आवर्जून पहावं. ज्यांचे आईवडील नाहीत त्या अनाथांच्या जीवनात एकदा झाकून पहावं त्यांनी काय गमावलय आणि तुम्ही काय मिळवलंय याची अनुभूती येईल..
पहावं जाऊन ते माणसांनी फुलवलेले बगीचे जे एका लयीत शिस्तबद्ध पद्धतीने बहरून जनमानसात प्रतिक्षण नवचैतन्य निर्माण करत असतात.
पाहावे ते निसर्ग सानिध्यात वाढलेले अस्तव्यस्त अफाट उंचीचे, गर्द दाटीचे भयाण जंगल. डोळ्यास सुखावत असले, आपणास पोषक असले तरी माणसं सहजासहजी तिकडे फिरकत नाहीत.
पहावं त्या दुष्काळ ग्रस्त भागात जाऊन... निसर्ग जेव्हा रुसतो तेव्हा काय परिस्तिथी निर्माण होते. आणि आजही काय भोग भोगावे लागतात.
म्हणूनच माणसांनी माणसा सारखे माणसात राहावे. आपाल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे कि आपल्याला जन्म देणाऱ्या आणि ज्या निसर्ग सानिध्यात आपण वाढतो त्याची कदर आपण केली पाहिजे.
.....नितेश पाटील ( धनसार)
९६३७१३८०३१
No comments:
Post a Comment