सस्नेह जय शिवराय
झाकली मुठ सव्वा लाखाची...
हि म्हण सर्वश्रुत आहे. काही गोष्टी प्रदर्शित न केलेल्याच बऱ्या. असा साधा अर्थ आहे या म्हणीचा. माणसाच्या मनात बरीच चलबिचल असते.असा एकही माणूस सापडणार नाही कि त्याला कुणा एकाचं तरी असं गुपीत माहीत नसेल कि जे माहीत झाल्यावर त्या गोष्टीचा त्रास किव्हा त्याचे परीणाम चांगले होणारे नसतात.
म्हणजेच प्रत्येक माणसाच्या कितीही जमेच्या बाजू असल्या तरी आजच्या या घोर कलयुगात त्याचं एखादं तरी गुपीत तो आपल्या आप्तजनापासून, मित्रांपासून, लोकांपासून लपवत असतो. अपवाद तसे कमीच सापडतील. आणि ते गुपीत तो कुणाला सांगणार नाही यालाच आपण विश्वास असं नाव देतो. आणि पर्यायाने विश्वासघात हा शब्दही आपल्या जीवनात येतो.
कुठेतरी तो विश्वास जिवंत ठेवण्यासाठी माणूस सतत नकळत का होईना ..?? धडपड करत असतो. हे नाकारता येणार नाही. त्याच गुपीत फुटलं की तो म्हणत असतो...सारं करायला लागत होतं पण एवढं सांगायला नको होतं. माझा विश्वास घात केला त्यांनी. अरे पण भावड्या तु तसा वागतोसच का आधी. आपली शेंडी दुसऱ्याच्या हातात का द्यायची...????
आता राहीला प्रश्न झाकली मुठ जर सव्वा लाखाची मग उघडली तर कीती ? त्याची एक कथा प्रचलित आहे.
एका गावातील मंदिरात एक ब्राह्मण असतो.आता मंदिरांना ब्राह्मण कमी सापडतात म्हणा...त्याच्या मनात एक विचार येतो.आपण मंदिरासाठी पाचेक हजार खर्च करून मंडप वैगरे टाकून मंदिराच्या उद्घाटनाला मंत्र्याला बोलवायचे. मंत्री खुश होऊन बक्कळ पैसे (देणगी) देणार आणि आपण उजरणार..!!
अपेक्षा ठेवली ती हि कोणाकडून तर मंत्र्याकडून..आहे का शक्य..?? सारा तामजाम झाला, मंत्रीही आला, लोकही आली. लोकांना काय घेणं. देवाचा प्रसाद म्हणुन का होईना रेटून खालं. मंत्री दर्शनाला गेले आणि पिंडीवर मात्र सव्वा रुपया ठेवला. आणि निघून गेले, लोकही निघून गेली. पण पुजारी मात्र बुचकाळ्यात पडल्यागत झाला. इतका खर्च केला आणि नशिबी काय आलं तर सव्वा रुपया. आता करावं काय.....????
पण ब्राह्मण फार हुशार होता. त्याला एक युक्ती सुचली. त्याने तो सव्वा रूपया पिंडीवरून उचलला मुठीत आवळून धरला आणि चौकात आला. बघा बरं आता गंमत..!! आणि ती मुठ पुढे करून मोठ्याने गरजला. इथे लक्ष द्या...
मला मंत्र्याने अशी वस्तू दिलय कि तिचा लिलाव करायचा आहे. बोली लावा.... आता आपल्या समाजात गरिबांची कमी नाही तशी पैशेवाल्यांचीही कमी नाही. मौल्यवान वस्तूंचा ठेवा जपायचा. मग कितीही पैसा खर्च होउदे. आपलं नाव झालं पाहिजे..बसस.... गरिबांकडे कोण लक्ष देतंय... असो...
एक उठला नि म्हणाला पन्नास हजार... म्हंटलं झोपेतून उठलाय का तु ? पन्नास हजाराला येत असते का हि वस्तू ? पुढे. दुसरा उठला नि म्हणाला पंच्याहत्तर हजार... म्हंटल आंघोळ केलती सकाळी अंघोळ ? एवढयात येत असते का हि वस्तू ? लोकांनाही वाटलं काय हिरा वैगरे असेल बहुतेक. तिसरा उठला नि म्हणाला एक लाख... आता मात्र ब्राह्मणाच्या मनात लाडू फुटले.....
तोवर दुसऱ्या गावात गेलेल्या त्या मंत्र्याची गाडी परतताना चौकात गर्दी बघून थांबली. आणि विचारपूस केली तर कळलं कि मंत्र्याने दिलेल्या वस्तूचा लिलाव करायला लावलाय. आणि तो एक लाखापर्यंत गेलाय. मंत्र्याने पुढील कार्यक्रम ओळखला.आपल्या इज्जतीच प्रश्न आहे. गाडीतून निघाला तो थेट ब्राम्हणाजवळ.... त्याला म्हणाला सव्वा लाख देतो पण मुठ खोलू नको..!! अशी गंमत आहे हि...झाले ना सव्वा रूपायचे सव्वा लाख
झाकली ती सव्वा लाखाची....
आणि उघडली तर सव्वा रुपयाची....
शेवटी किंमत अकलेलाच...
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१
No comments:
Post a Comment