Wednesday, December 30, 2015

कविवर्य मंगेश पाडगावकर

कविवर्य मंगेश पाडगावकर यांना
भावपूर्ण श्रद्धांजली....
यु तो कई लोग
आये दिन मर जाते है ।
जहाँ में कुछ लोग ही
जिंदा रह जाते है ।।
माना कि यहाँ गिनती
इंसानो कि होती है ।
याद वही रहते है
जो इन्सानियत निभाते है ।।
प्यार हर कोई करता है
यहाँ जिंदगी से ।
जो प्यार करना सिखायें
वो अमर हो जाते है ।।
दिवाने जिसके लोग
इस दुनीया में ।
आसमाँ के चांद, तारे
कहा छुट पाते है ।।
कई दशको तक
मैफ़ीले सजाई आपने ।
आज थम सा गया वो वक्त
नम आखों से तुझे सलाम करते है ।।
.........नितेश पाटील

Saturday, December 26, 2015

झाकली सव्वा लाखाची

सस्नेह जय शिवराय

झाकली मुठ सव्वा लाखाची...
हि म्हण सर्वश्रुत आहे. काही गोष्टी प्रदर्शित न केलेल्याच बऱ्या. असा साधा अर्थ आहे या म्हणीचा. माणसाच्या मनात बरीच चलबिचल असते.असा एकही माणूस सापडणार नाही कि त्याला कुणा एकाचं तरी असं गुपीत माहीत नसेल कि जे माहीत झाल्यावर त्या गोष्टीचा त्रास किव्हा त्याचे परीणाम चांगले होणारे नसतात.
       म्हणजेच प्रत्येक माणसाच्या कितीही जमेच्या बाजू असल्या तरी आजच्या या घोर कलयुगात त्याचं एखादं तरी गुपीत तो आपल्या आप्तजनापासून, मित्रांपासून, लोकांपासून लपवत असतो. अपवाद तसे कमीच सापडतील. आणि ते गुपीत तो कुणाला सांगणार नाही यालाच आपण विश्वास असं नाव देतो. आणि पर्यायाने विश्वासघात हा शब्दही आपल्या जीवनात येतो.
        कुठेतरी तो विश्वास जिवंत ठेवण्यासाठी माणूस सतत नकळत का होईना ..?? धडपड करत असतो. हे नाकारता येणार नाही. त्याच गुपीत फुटलं की तो म्हणत असतो...सारं करायला लागत होतं पण एवढं सांगायला नको होतं. माझा विश्वास घात केला त्यांनी. अरे पण भावड्या तु तसा वागतोसच का आधी. आपली शेंडी दुसऱ्याच्या हातात का द्यायची...????
        आता राहीला प्रश्न झाकली मुठ जर सव्वा लाखाची मग उघडली तर कीती ? त्याची एक कथा प्रचलित आहे.
          एका गावातील मंदिरात एक ब्राह्मण असतो.आता मंदिरांना ब्राह्मण कमी सापडतात म्हणा...त्याच्या मनात एक विचार येतो.आपण मंदिरासाठी पाचेक हजार खर्च करून मंडप वैगरे टाकून मंदिराच्या उद्घाटनाला मंत्र्याला बोलवायचे. मंत्री खुश होऊन बक्कळ पैसे (देणगी) देणार आणि आपण उजरणार..!!
          अपेक्षा ठेवली ती हि कोणाकडून तर मंत्र्याकडून..आहे का शक्य..?? सारा तामजाम झाला, मंत्रीही आला, लोकही आली. लोकांना काय घेणं. देवाचा प्रसाद म्हणुन का होईना रेटून खालं. मंत्री दर्शनाला गेले आणि पिंडीवर मात्र सव्वा रुपया ठेवला. आणि निघून गेले, लोकही निघून गेली. पण पुजारी मात्र बुचकाळ्यात पडल्यागत झाला. इतका खर्च केला आणि नशिबी काय आलं तर सव्वा रुपया. आता करावं काय.....????
        पण ब्राह्मण फार हुशार होता. त्याला एक युक्ती सुचली. त्याने तो सव्वा रूपया पिंडीवरून उचलला मुठीत आवळून धरला आणि चौकात आला. बघा बरं आता गंमत..!! आणि ती मुठ पुढे करून मोठ्याने गरजला. इथे लक्ष द्या...
मला मंत्र्याने अशी वस्तू दिलय कि तिचा लिलाव करायचा आहे. बोली लावा.... आता आपल्या समाजात गरिबांची कमी नाही तशी पैशेवाल्यांचीही कमी नाही. मौल्यवान वस्तूंचा ठेवा जपायचा. मग कितीही पैसा खर्च होउदे. आपलं नाव झालं पाहिजे..बसस.... गरिबांकडे कोण लक्ष देतंय... असो...
             एक उठला नि म्हणाला पन्नास हजार... म्हंटलं झोपेतून उठलाय का तु ? पन्नास हजाराला येत असते का हि वस्तू ?  पुढे. दुसरा उठला नि म्हणाला पंच्याहत्तर हजार... म्हंटल आंघोळ केलती सकाळी अंघोळ ? एवढयात येत असते का हि वस्तू ? लोकांनाही वाटलं काय हिरा वैगरे असेल बहुतेक. तिसरा उठला नि म्हणाला एक लाख... आता मात्र ब्राह्मणाच्या मनात लाडू फुटले.....
          तोवर दुसऱ्या गावात गेलेल्या त्या मंत्र्याची गाडी परतताना चौकात गर्दी बघून थांबली. आणि विचारपूस केली तर कळलं कि मंत्र्याने दिलेल्या वस्तूचा लिलाव  करायला लावलाय. आणि तो एक लाखापर्यंत गेलाय. मंत्र्याने पुढील कार्यक्रम ओळखला.आपल्या इज्जतीच प्रश्न आहे. गाडीतून निघाला तो थेट ब्राम्हणाजवळ.... त्याला म्हणाला सव्वा लाख देतो पण मुठ खोलू नको..!! अशी गंमत आहे हि...झाले ना सव्वा रूपायचे सव्वा लाख
         झाकली ती सव्वा लाखाची....
आणि उघडली तर सव्वा रुपयाची....
शेवटी किंमत अकलेलाच...
   .......नितेश पाटील
९६३७१३८०३१
        
       

Saturday, December 19, 2015

पुस्तकं

सस्नेह जय शिवराय...    १२.१२.२०१५
पुस्तकं

      थोर महापुरुषांची, वीरांची गाथा संपूर्ण जगात सर्वश्रुत असते. ती पुस्तकं, त्यातील संदर्भ, इतिहासातील दाखले, काही कागदपत्र, शिलालेख आणि बरच काही. आणि ते मिळवण्यासाठी धेय्यवेड्या साहित्यिकांनी जीवाचं रान करून आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून ती कमावलेली ऐवज असते. त्याचा काही मोबदला मिळवा म्हणून ते काही हे कार्य करीत नसतात.पुढच्या पिढीला इतिहासाची अनुभूती यावी , सुसंस्कार घडावेत, राष्ट्रप्रेम जागृत व्हावं इतकीच काय ती मनीषा असावी.
      अस असताना एखादा असाही लेखक असु शकतो कि त्याचे विचार नेमके उलट प्रवाही असू शकतात .एखादा मजकूर पुस्तकात असा काही लिहून जातात कि वाचणाऱ्याच्या मनात द्विधा परिस्तिथी उत्पन्न होते. आणि मग विचारांच युद्ध चालू होतं. मनात आणि आपसूकच समाजातही. हा आता त्यात कोण जिंकतो हे ज्याच्या त्याच्या ज्ञान क्षमतेवर अवलंबून असत.शेवटी काय आत्मसात करावं काय नाही याचा सर्वस्वी हक्क आपलाच तर असतो ...!!! पण काही जरी असल तरी विजय नेहमी सत्याचा, अचूक योग्य विधानांचा होत असतो.
      थोर महापुरुष, साधु, संत यांच्याबद्दल तुम्ही आम्ही सांगण्याची गरज नाही . इतक्या कालांतरा नंतरही त्यांची कीर्ती अजरामर असेल तर ती उगाच नाही.समाज सकारात्मक विचाराने घडत असतो.नकारात्मक विचाराने बिघडत असतो. काही लोकं जी नकारात्मक विचार मांडतात त्यावरून काय सिद्ध करू पाहतात हे मला माहित नाही किव्हा मला त्या वादात हि पडायचं नाही.
      पण आपण आजची परिस्तिथी लक्षात घेतली पाहिजे. आज जी जगामध्ये अराजकता दिसतेय त्यामागे निश्चितच नकारात्मक विचार असणाऱ्या निधर्मी लोकांचा हात आहे हे नकारता येणार नाही.  आज समाजाला चांगल्या विचारांची गरज आहे. भडकाऊ मुद्दे उपस्तीथ करून किव्हा तशी परिस्तिथी निर्माण करून काय सिद्ध करू पाहतात देवच जाने. पण त्यात माणूस सामान्य माणसाच नुकसान करतो हे मात्र नक्की. प्रपंचाची चिंता असतेच त्यात समाजात निर्माण झालेल्या वादाला इच्छा नसली तरी तोंड देणं चुकत नाही.
       मुद्दा हा आहे कि आपण इतिहासातून आजवर काय शिकलो. इतिहासात म्हणा किव्हा समाजात, जगात म्हणा. मतप्रवाहमध्ये भिन्नता असते नव्हे ती आहेच आणि त्याचा फायदा काही दळभद्री लोकं घेत असतात. अशी लोकं निधर्मी असतात त्यांना समाजाशी, धर्माशी काही देणंघेणं नसतं.ते फक्त आणि फक्त स्वस्वार्थासाठी जगत असतात हि वस्तुस्तिथी आहे.
       इतिहासात जशी महापुरुषांच गुणगौरव, सचरित्र इमाने वदनारी ,साक्षी पूराव्यांचा संदर्भ देणारी जनहितार्थ सक्षम असणारी पुस्तकं अमाप आहेत. ती गौरांवित झालेली आहेत. या भारत वर्षात लेखकांची कमी नाही. अगणित लेखक आहेत .त्या त्या लेखकाला मानणारा , त्यांच्या विचारांच समर्थन करणारा वर्गही निःसंशय असतो. पण त्या पुस्तकात लेखकाचं त्याला आलेल्या प्रचितीच त्याच वैयक्तिक मत तो प्रदर्शित करीत असतो.
     ते सत्य असत्य लागलीच ठरावण्यापेक्षा आपण आजवर मिळवलेल्या ज्ञानातून चिंतन करून पडताळून पाहणं गरजेचं असतं. अन्यथा ते इतरांसमोर प्रदर्शित करू नये.
       आज जरी मी हे बोलतोय ते तुम्हाला पटलेच असं नाही हे माझं वैयक्तिक मत आहे.ते चूक कि बरोबर सत्य कि असत्य हे ठरवण्याची क्षमता भावनेच्या आहारी न जाता ज्ञानावर ती अवलंबून असावी.
      काहीही प्रदर्शित करताना आपण त्या मताशी व्यक्तिशः पूर्णतः डोक्याने सहमत असाल तरच ते प्रदर्शित करावं.
शेवटी वैयक्तिक पुस्तके हि समाजातील प्रतिष्ठित संस्थेची,माणसाची असली तरी ती प्रत्येकाला पटतीलच असं मला तरी वाटत नाही.
   हे सांगायचं कारण इतकच कि कोणीही उठतो महापुरुषांचा अपमानास्पद मजकूर टाकून नंतर एखाद्या पुस्तकाचा दाखला देतो आणि मोकळा होतो.
काय राव...!!! चांगलं आहे ते घ्यावं माणसांनी. इतरांचा आत्मा दुखेल अश्या प्रकारचे मजकूर बाजूला सारवेत. काय बिघडत त्यात ? राहूदे की तो तिथेच पडुन. बघा जमतंय का....!!!

....नितेश पाटील
९६३७१३८०३१

विचारांचा प्रचार प्रसार

चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार
तितक्या लवकर होत नाही
जितक्या लवकर वाईट गोष्टींचा होतो
           वाईट गोष्टी वादाच्या भोवऱ्यात असल्यामुळे
लोकांनाही त्या गोष्टीकडे पाहण्याची एक भलतीच उत्सुकता आणि ओढ असते, त्यामुळे वाईट असणारी गोष्ट ही अधिक प्रसिद्धीझोतात येत असते. आणि त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत असतो.याचं खरं कारण म्हणजे मतभिन्नता.एकाच आईच्या उदारातून जन्म घेणारी, तिच्या कुशीत वाढणारी, तिच्या संस्कारातून बहरणारी मुलही एकमेकांविरोधात उभी ठाकतात तिथं दुसऱ्याचं काय म्हणा...!!!! परंपरेनुसार मतभिन्नता आपसूकच माणसामध्ये येत असते.भारतवर्षात रूढी परंपरेचा डंका अधिक प्रमाणातच आहे. त्या रूढी परंपरेला जागणारा, मानणारा समुदाय सृजन, सुविचारधीन असला तरी माणसाला माणसापासून वेगळा करणारा आहे हे नाकारता येणार नाही.
             मग आपापसात झगडे, लढाई, त्यातून निर्माण झालेले वैयक्तिक वाद, वैमनस्य, माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या वाईट गोष्टींचा परीणाम कुठेतरी साऱ्याच मानवजातीवर पडत असतो. विचारांची देवाणघेवाण जरी माणूस करत असला तरी आज वाईट विचारांच्या जाळ्यात माणूस कुठेतरी गुरफटत चालला आहे. वाईट गोष्टी म्हणण्याचं कारण इतकच कि कुठलाही विचार जर माणसाला माणसापासून , मणुसकीपासून तोडत असेल तर तो चांगला विचार कसा होऊ शकतो ?
         याउलट आपल्या भारत वर्षात अनेक साधुसंत, महात्मा, थोर महापुरुषांची परंपरा असूनही, त्या थोरांचे विचार सहज,सोपे जनकल्याणकारी असूनही त्याचा प्रसार कमी होताना दिसतो. आणि काही समाजकंटक, महाभाग असेही आहेत कि त्या विचारांच भांडवल करून स्वस्वार्थासाठी माणसाना आपापसात लढवत आहेत.दोष त्यांचा नसावा कुठेतरी आपला अभ्यास, ज्ञान आज कमी पडत आहे. आपण सुखासाठी इतके  आतुर झालोत कि आपल्याला दुसऱ्या कशातही स्वारस्य राहिलेलं नाही. फक्त सुख पाहिजे. आपला अभ्यास फक्त पदाव्यांपूर्ती मर्यादित नसावा तर जनहितार्थ ज्ञान आपण कमावलं पाहिजे. ते संत संगतीने कमावता येईल यात शंका नसावी. आणि त्या संतविचारांचा प्रसार करायला हवा.
........नितेश पाटील
९६३७१३८०३१

Monday, December 7, 2015

परिस

परीस

परीसाच्या स्पर्शाने सोनं होत असं म्हणतात..!!
पण वस्तुरूप सोनं होण्यापेक्षा मनाचं सोनं झालेलं केव्हाही उत्तम. आज या कलयुगात, स्वार्थाच्या दुनियेत माणूस सत्ता, संपत्तीच्या मागे स्वस्वार्थासाठी अनासये धावतोय.आणि हे नश्वर असलं तरी ते मिळवण्याची पराकाष्ठा तो करीत आहे. स्वतःच आयुष्य जर परीसात रूपांतरित केलं तर इतरांच्या देहाचं सोनं करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण या क्षणभंगुर दुनियेत तो स्वतःच अस्तित्व कुठेतरी विसरला आहे.
         एका लोखंडाच्या डबीत परीस आहे. नियमाने ती डबी सोन्याची झाली पाहिजे कि नाही ? पण ती डबी सोन्याची होत नाही.याचा अर्थ त्या डबीत परीस नाही का ? त्या डबीत परीस आहे पण... इथे पण फार महत्वाचा आहे. त्या डबीत परीस आहे पण तो कागदात गुंडाळलेला आहे. त्याच प्रमाणे माणसात ईश्वर आहे. पण माया, मोह, मद, मत्सर, मीतूपणा, अहंकार यात तो गुरफटला आहे. हे सहा गुण धुतल्याशिवाय, बाजूला सारल्याशिवाय मानवरूपी देहाचं परीसात, इश्वरात रूपांतर होणं शक्य नाही.
        प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो.एक अशी संधी येत असते कि आपल्या जीवनाचं परीस नव्हे तर निदान सोनं तरी करता येणं शक्य असतं. कधी आई- वडिलांच्या रूपाने, कधी गुरुजनांच्या रुपाने, कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने, कधी मित्र-मैत्रिणीच्या नात्याने, कधी प्रेयसीच्या नात्याने. कोणत्या ना कोणत्या रूपात परीसाची संगत आपल्याला लाभत असते.
       सर्वात महत्वाचं म्हणजे खरोखरच आपल्याला आपल्यातल्या लोखंडाचे सोने करायचं असेल वा परीस बनायचं असेल तर आज आपल्याला संतांच्या थोर विचारांची संतसंगतीची गरज आहे. आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो.पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. आणि आज ज्या संतांचे, थोर महापुरुषांचे वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील सगुण मंडळींचे गोडवे गातो. त्यांनी आपलं आयुष्य जनहितासाठी परीसप्रमाणे लोखंडाला सोनं करण्यासाठी खर्ची घातलंय हे नाकारता येणार नाही.
       आता आपल्याला विचार करायला हवा कि आता आपण परीस व्हायचं, सोनं व्हायचं,कि लोखंड बनून आजन्म हतोडीचे दणके सहन करीत राहायचं...!!!

.......नीतेश पाटील
९६३७१३८०३१

Saturday, December 5, 2015

चेहऱ्यांची किमया

#चेहऱ्यांचीकिमया

      परमेश्वराने जीवाची उत्पत्ती केली असं वेदांचे, पुरणाचे म्हणने आहे.त्यात कैक प्रकारचे जीव येतात.त्या साऱ्यात देवाला मानणारा प्राणी म्हणाल तर माणूस. माणूस आहे म्हणून देवाचं अस्तित्व आहे.आणि देव आहे म्हणून जीवांच अस्तित्व आहे. हे नाकारता येणार नाही. शेवटी श्रद्धा नाही असा माणूस या भूतलावर नाही.ती कसली का होईना.!!. श्रद्धा म्हणजेच परमेश्वर म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
        जनावरांना भावना असल्या तरी त्याची फारसी कदर कुणी करत नाही.इथे माणसाची कदर केली जात नाही तिथे जनावरांच काय म्हणा..!! पण आपण निरखून पाहिलं तर कळेल कि जनावरांच्या चेहऱ्यांमध्ये बहुतांशी साम्य असतं. त्यांना नावं कमी असतात. त्यांना गाय, बैल, बकरी, वाघ, सिंह वैगरे...अश्या नावानेच जास्त ओळखले जाते.
         माणसाना मात्र प्रत्येकाला नावं असतात.हा त्या नावात साम्य (१००%)असू शकतं पण चेहऱ्यात नाही. मला हा प्रश्न नेहमीच पडतो. या विश्वात अब्जावधी लोकं आहेत पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य का नसावं ? (काही अपवाद वगळता) बरं चेहरा दिसतो तशीच ती व्यक्ती असेल असही सांगता येत नाही. हल्ली चेहर्यावर नाना प्रकारचे मुखवटे असतात ते वेगळे.साहजिकच विचारातही भिन्नता असते. पण हा नश्वरनिष्ठ माणूस चेहऱ्यांवरच भाळतो हे मात्र नक्की...
          आता हा प्रश्न राहिला. हे असं असण्यामागे नेमकं कारण काय ? त्यात नर आणि नारी याबाबतीत विचार केला कि डोकं आणखीन चक्रावून जातं. काय किमया असेल ना परमेश्वराची ? असो पण त्याचही पत माणूस घ्यायला बसलाय. या कलयुगात काही सांगता येत नाही हो..!!
शेवटी माणसाने माणूस धर्म पाळला पाहिजे.माणसात धर्माच्याही व्याख्या वेगवेगळ्या झालेल्या दिसून येतात. ईश्वराने माणूस निर्माण केला आणि माणसाने धर्म,जाती,पोटजाती निर्माण केल्या.माणूस धर्म पाळणं तस अवघड नसतं. वेळेवेळी आपल्या पुढयातील माणूस धर्म आपण पळाला पाहिजे.उदा....एखादी नारी जेव्हा आई होते तेव्हा ती आईचा धर्म निस्वार्थीपणाने आपला जीव ओवाळून पाळते अगदी त्याप्रमाणे.....
असो काही झालं, माणूस कितीही प्रगत झाला तरीही तो नैसर्गिक किमया घडवू शकत नाही. ती लीला परमेश्वराचीच.....
नावाने जरी ओळखत असलो आपण
चेहऱ्याची ती किमया आहे...
अब्जावधी लोकांमध्ये
कितीस साम्य आहे...?
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१

Tuesday, November 17, 2015

बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन

बाळासाहेब ठाकरे
१७ नोव्हेंबर २०१५ बाळासाहेबांचा तिसरा स्मृतिदिन.....
भावपूर्ण आदरांजली....
लाखो हिंदूंच्या मनावर अधिराज्य करणारे हिंदुहृदयसम्राट संपूर्ण जनसमुदायाला सोडून अनंतात विलीन झाले तो दिवस. (१७ नोव्हेंबर२०१२) त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि राहतील. संग्रहित असं बरच आहे, शब्द अपुरे पडतील. मातीच्या रंगाचं काळीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आयुष्याचं रणांगण करताना सार्थकतेचा आनंद होतो. पण, दुर्दैवानं लाचारीचं व्यसन लागलेले काही लोक मातीच्या ममतेहून सत्तेची महती महान मानायला लागतात. अशा वेळी कोणालाही सत्तेची स्वप्नं पडू लागतात. महाराष्ट्राची नेमकी हीच अवस्था झालेली असताना मातीच्या उद्धारासाठी सज्ज झालेल्या बाळ केशव ठाकरे नावाच्या तरुणाची एक गगनभेदी गर्जना महाराष्ट्राच्या मनावर आणि भारताच्या कानावर आदळली. उपर्‍यांची दादागिरी नष्ट झाली आणि महाराष्ट्र जागा झाला.प्रबोधनाची परंपरा असणार्‍या घरात, त्यांचा जन्म झाला. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला. मराठी माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्र-विकासाच्या कल्पवृक्षात करणारे हिंदुहृदयसम्राट. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम चपराक लगावली.महाराष्ट्रात निर्माण झालेले,मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी त्यांनी १९ जून, १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईत अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३०ऑक्टोबर,१९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. दादरमधील शिवाजी पार्क मैदानाचं शिवतीर्थात रूपांतर झालं.शिवतीर्थावरून बाळासाहेब महाराष्ट्राला काय संदेश देतात याकडे जनतेचे, राजकीय नेत्यांचे, पत्रकारांचे, अभ्यासकांचे लक्ष ते हयात होते तोपर्यंत अखंड पाहण्यास मिळालं.शिवसैनिकांची जणू ती पंढरीच होती नि आहे.वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य.शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र ऐका ओढीने पाहत होता.महाराष्ट्राविषयीचा प्रखर अभिमान व मुंबईवरील प्रेम या विषयांसह हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. बॉम्बे चे मुंबई असे नामकरण झाले ते हि त्यांच्यामुळेच.असे कैक निर्णय त्यांनी महाराष्ट्र हिताचे घेतले.जातीपातींचे राजकारण, कुटील राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेबानी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार आपल्या वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने अंमलात आणणे  अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. त्यांनी असंख्य नेते घडविले.स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची सत्ताकारणाची पद्धतही खास त्यांचीच.अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.मराठी असंतोषाचा उद्घोष व मराठी अस्मितेचा जयघोष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज. छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या हृदयात दोनच गोष्टी अखंडपणे तेवत आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांचे कर्तृत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक, प्रेरणादायी असे वक्तृत्व व विचार.बाळासाहेबांनी त्यांच्या वडिलांना एक प्रश्न विचारला होता. श्रीमंती म्हणजे काय ? तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या दारात जाऊन घरात आलेल्या लोकांच्या चपलांचे जोड दाखवुन म्हणाले होते, बाळ जितके हे जोड तुझ्या दारात जास्त तितका तू श्रीमंत. आणि पुरी हयात बाळासाहेबांनी माणसं कमावली. त्यांच्या अंत्ययात्रेला आलेल्या माणसाचं मूल्यांकन जगात कुणाला करता येणार नाही. इतका श्रींमंत माणूस ...
संग्रहित....
शब्द नाही उरले
काय वर्णू तुम्हा मी
सुन्न झाल्या दाही
भरल्या अश्रूंनी
विचारांच सोनं
शिवतीर्थ मैदान
तेवत राहील ज्योत
सदैव माझ्या अंतरात
.....नितेश पाटील
साहेब गेले त्या दिवशी केलेली श्रीनिवास चितळे काकांनी केलेली कविता खाली दिली आहे ,बाळासाहेब या व्यक्ती विषयी आमच्या या भावना होत्या आणि आहेत .
महाराष्ट्राचे तेज आज ते तेजाला भेटे
अंधाराची घार अवदसा ,घिरट्या की घेते !
चराचराची वीज संपली जरी आपोआप ,
अशी कशी या बाळi लागे आज काळझोप !
तेजावरर्ती ओरखडा का उठे काजळीचा
आज समावे सुपुत्र जणू की कुशीत धरतीच्या !
मशालीचा तो पोत जळे तो जिथे अहोरात्र
धूम्र पाहुनी गळून गेली क्षितिजाची गात्र !
उचंबळावा जनसागर हि ऐकून ती वाणी
मुका जाहल्या वीरा पाहुनी नयनी ते पाणी !
गंभीर झाली अरबी अर्णवा ,तुझीच ती लाट
तुझ्या किनारी आज रेखीसी कशी मसणवाट!
इमारतीवर रविकिरणांचा का न दिसे साज
काळोखीचा तवंग पसरे जणू तेथे आज !
जिथे गाजली सभा तयाची लाखा लाखाची
तिथे लोटली धाड आज परी काक गिधाडांची !
सह्याद्रीच्या विराट देही भरला थरकाप
सिंहगडाचे शिखर डळमळे का आपोआप !
रायगडावर मान ठेवूनी महाराष्ट्र माता
कृष्णा गोदा उर बडवुनी जणू रडती आता !
१७.११.२०१५

Sunday, November 15, 2015

चिंतन

#चिंतन
            बऱ्याच वेळा कसं होत कि आपल्याला सांगणारे अनेक जण असतात पण सारेच आपल्या हिताचं सांगतीलच अस नाही. मुळात दुसऱ्याला सांगण्यापूर्वी ते आपल्याला माहित असावं.जे काही दुसऱ्याला सांगायचं आहे ते समोरच्याला समजलं पाहिजे अथवा त्याला समजेल अश्या भाषेत आपण प्रस्तुत केलं पाहिजे.ते त्याच्या हिताचं असलं पाहिजे.नाहीतर चर्चेच्या ओघात एखादा विषय निघतो आणि तो आपल्या स्मरणात राहतो प्रसंगी आपण तो समोरच्याला सांगत सुटतो पण त्यामागचं मूल्यांकन आपण आधी करायला हवं नंतरच तो विषय इतरांसमोर मांडावा.
     आपण एक दाणा पेरला कि तो हजारो दाणे परत करतो. निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत, इतरांना आपण काय सांगत आहोत ,दुःख, राग , द्वेष पेरत असू तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल.आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काही शंकाच नाही.
      आणि एकणारही नेभळट नसावा बरं.एकणाऱ्या मध्येही एक वर्ग असा असतो जो समोरच्याच ऐकत असतो आणि सोडून देत असतो.त्याला काही घेणं देणं नसत तुम्ही काहीही म्हणा हिताचं अथवा अहिताचं .तो सांगणाऱ्याला मूर्ख समजत असतो.असे किती सांगणारे आले ....मला सारं कळतं... मुळात त्याला काहीच कळत नसतं.... आणि खरं सांगायचं तर अश्या लोकांची संख्याही भलतीच वाढलय.
      दुसरा वर्ग असा असतो सांगण्याऱ्याच ऐकत असतो इतरांना बोलून दाखवत असतो. पण का कुणास ठाऊक तो चिंतन करीत नाही.समोरचा बोलतोय ते योग्य, अयोग्य काही तपासून पाहत नाही. विसंबून राहतो. अरे पण किती काळ विसंबून राहणार तुझं हित ,अहित तुला कळायला नको ? आज अश्या लोकांचा फायदा घेणाऱ्या टोळ्याच आपल्याला समाजात वावरताना जागोजागी दिसतील. जस लहान मुलांच्या हातातील बाहुल्यांची जशी अवस्था असते काहीशी त्याच प्रकारची अवस्था ह्या वर्गाची असते.
     तिसरा वर्ग असा असतो जो समोरच्याच ऐकत असतो ,मनात त्याचं चिंतन करत असतो. आपल्याजवळ आलेल्या विचारांच मूल्यांकन आपण आजवर कमावलेल्या ज्ञानप्रकाशत करून पाहतो. तो कधीही वाद घालीत बसत नाहीत. तो सत्याचा शोध घेतो. ज्याला सत्याची प्राप्ती झाली आहे असा मनुष्य अंतर्यामी शांत होऊन जातो. अहंकारी माणसे वादासाठी निमित्त शोधत असतात.
अनेकदा वाद घालण्याचे मुद्दे अत्यंत क्षुल्लक असतात, पण त्यामुळे मनाचे संतुलन ढळते. दिवसेंदिवस अहंकार परिपुष्ट होत राहतो.अनेकदा आपले मत दुसऱ्यावर लादण्यासाठी माणसे वाद घालीत बसतात, पण हे वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण नाही. माणसाने प्रत्येकाची भूमिका समजावून घ्यावी. भिन्न भिन्न विचार प्रवाह या विकासाच्या निरनिराळ्या पायऱ्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. वैचारिक मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे......आज माणूस बौद्धिकदृष्ट्या आश्चर्यकारक प्रगत होतो आहे. पण मानसिकदृष्ट्या त्याचे खूप पतन होते आहे.सुखसंवादामध्ये हितासाठी बोलले जाते. अनेक विचारांची फुले एकत्र करून सद्भावांचा गुच्छ तयार केला जातो. माणसाने बोलणे सुधारण्यापेक्षा वागणे सुधाराले पाहिजे.ज्यांचे आचरण मंगल आहे ती माणसे कधी वादात पडत नाहीत.
         प्रत्यक्ष आचरणात काही नसते, पण बौद्धिक अभ्यास खूप झालेला असतो असा माणूस ज्ञानाच्या अहंकाराने वाद घालून स्वत:चे नुकसान करून घेतो.त्याला तुम्ही उत्तम श्रोता कसं म्हणाल. चर्चेच्या ओघात वाहवत न जाता तिच्या मुळाशी पोहचण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला पाहिजे.नंतरच त्या गोष्टीच समर्थन आपण करायला हवं....
शेवटी चिंतन महत्वाचं....
.........नितेश पाटील
१५.११.१५
९६३७१३८०३१

Sunday, October 18, 2015

प्रतापगड मशालमहोत्सव २०१५

सस्नेह जय शिवराय                                                                               नितेश पाटील  ९६३७१३८०३१
प्रतापगड मशाल महोत्सव २०१५                                                                   १६/१७ .१०.२०१५
सस्नेह जय शिवराय
प्रतापगड मशालमहोत्सव शुक्रवार दि.१६.१०.१५
मंत्रमुग्ध करणारा देदिप्यमान सोहळा……
खरं सांगायच तर श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने, त्यांच्या पराक्रमाणे पावन झालेल्या गड किल्ल्यांवर फिरणे हे कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा माझ्यासाठी जास्तच .त्याच्या सानिध्यात गेल्यावर जर महाराजांचा ईतिहास तुम्हाला माहीत असेल ( नसेल तर महाराष्ट्रात जगणं सोडुन द्यावं ) तर अंगावर रोमांच( हातावरचा केस न केस त्या परमेश्वरास नमन करण्यासाठी ऊभा राहतो ) उभं राहील्या शिवाय राहणार नाही.महाराजांचा ईतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचे पराक्रम, त्यांच शासन… त्यांच्यासाठी, स्वराज्यासाठी वेळी मरणास तत्पर असणारे निस्वार्थी एकनिष्ठ १००स१ असे या मातीशी प्रामाणिक असणारे कैक मावळे, त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य , हे स्वराज्य व्हावे हि त्या काळी श्री ची ईच्छा होती. आणि त्यासाठी आपले सर्वस्व स्वराज्यासाठी अर्पण करणारा मंत्रमुग्ध होणारा समाज होता.आताही असेल पण फरक आहे आता श्रीला जान्हवीच्या मागे लावलयं.ते पाहण्यात समाज ईतका गुंग झालाय कि श्री ला ही काहिहि म्हणु लागले.समाज ईतका अधोगतीला का चालला हे कदाचीत मला सांगता येणार नाही .सण सोहळ्यांची दुर्दशा करुन टाकली.त्याला अपवाद असतात हे पारंपारीक, सांस्कृतीक,देदिप्यमान सोहळे.
आज मीच लीहलेल्या काही ओळी ईथे नमुद करु ईच्छीतो

सण सोहळे

गाव एक अन् ऊत्सव अणेक
सण सोहळ्यांची का झाली दशा
कोणी केली त्यांची दुर्दशा...
प्रतिष्ठा मिरवणारी पिढी
राजकारण करणारी समाजप्रवृत्ती
असेल काही प्रमाणात मी ही...
सण म्हणजे करमणुक नाही
सण म्हणजे खेळ नाही
तुझा मोठा की माझा मोठा
तो काही घर बंगला नाही
आपापसात तु झगडत राहिला
चंगळवादि समाज वाढू लागला
का विसरला माणूस सणांचा
शुद्ध, सात्विक हेतू , मतितार्थ...
सज्जन समाज शोकात राहीला
दुर्जन समाज जोमात वाढला
जाण ती संस्कृतीची का धरु नये
स्पर्धेपायी पिढी ऊगा नासवू नये
अमुल्य अपुल्या सण, ऊत्सव, परंपरा 
अनादिकाळची प्रथा नासवू नये....
.............नितेश पाटील २९.९.१५
असो माझं हे असं होतं आपण कुठं होतो…..?


प्रतापगडाचा संक्षिप्त ईतिहास ……
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.


प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला ३५५ वर्षे पूर्ण झाली. प्रतापगड वासिनी जगदंबा आई भवानी मातेच्या मंदिराला ३५० वर्षे झाल्यापासून हा कार्यक्रम नवरात्रीमधील चतुर्थीला साजरा केला जातो. यंदा पहिली माळ दोन वेळेस आल्यामुळे हा कार्यक्रम अश्वीन शुद्ध तृतीयेस मोठ्या ऊत्साहात , जल्लोशात,पारंपारीक ,सांस्कृतीक पध्दतीने पार पडला. गत वर्षीप्रमाणे यंदाही आम्हास मशाल प्रज्वलीत करण्याचा सहभाग मिळाला.धन्य जाहलो…यंदा आम्हा पालघर धनसारकरांची ऊपस्तीथी ऊल्लेखनियच होती.गतवर्षी दहा जण,त्याच्या आधी  पाच जण आणि यंदा तब्बल साठ जण…ज्या वर्षी पहील्यांदा पाच जण गेले होते त्यात सुदेश, जीतु आणि त्यांचे मित्र पण त्यांच अहोभाग्य म्हणजे महाराजांचा ईतीहास ज्यांनी जीवंत केला घराघरात, प्रत्येकाच्या ह्रुदयात वसवला ते महान व्यक्तीमत्व गडावर उपस्थीत होते...मी काय वर्णू त्यांना तो माझा घास नाही. आत्ताच त्यांना महाराष्ट्रभुषन म्हणुन सन्मानीत करण्यात आलं त्यानिमीत्ताने काही ओळी लीहल्या होत्या...

महाराष्ट्र भूषण " शिवचरित्राचे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे)

मी काय वर्णावे त्यांसी साहित्यिकांचा सन्मान पुरंदरे
शिवनेरीच्या शिवरायांनी झपाटले ते पुरंदरे
भक्तिमार्गावर ज्ञानदीपचा प्रकाश  ते पुरंदरे
ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेले ते पुरंदरे
इतिहासातुन राष्ट्राचे शील शोधले ते पुरंदरे
शिवचरित्र एकमेव जीवितधेय्य साकारले ते पुरंदरे
शिवचरित्र लिहताना अखंड सावधान ते पुरंदरे
भूतकाळाचा अर्थ समजून इतिहास सांगणारे ते पुरंदरे
अंतकरणात कवी मोहरबंध गोंडेदार ते पुरंदरे
इतिहास संशोधन हे शास्त्र त्यांसी ते पुरंदरे
अंगाअंगावर रोमांच स्थापित करावे ते पुरंदरे
शिवसाक्ष पत्रासाठी प्रलयपाउस सहनारे ते पुरंदरे
भाषेच्या अंगातून अलगद ओसंडून जाणारे ते पुरंदरे
तपशीलांवर पकड़ ती भलतीच कडक ते पुरंदरे
शिवचरित्र आठवित पावले शोधत फिरले ते पुरंदरे
कालवस्त्रा दूर सारुन इतिहास दर्शन घडवणारे पुरंदरे
दिले आयुष्य मिळवले शिवचरित्र धन ते पुरंदरे
लोकशाहिला अत्यंत पोषक भूमिका देणारे पुरंदरे
किती निराशा,किती अपमान तरी न डगमगले ते पुरंदरे
अखेर महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित झाले ते बाबासाहेब पुरंदरे...

नतमस्तक मी तया चरणी उदात्त उदार ते पुरंदरेनितेश पटील २०.८.१५

समाज निच्छीतच जागृत असतो. कुणालातरी पुढाकार घ्यावा लागतो. पण तो पुठाकार घेत असताना मी पणाची जाणीव त्याच्या ह्रुदयात वास करता कामा नये.ती नव्हती अन् कधी राहणारही नाही जो महाराजांचा होईल तो तो जणतेचा निच्छितच होईल यात तिळमात्र शंका नाही.ते बिजच ईतकं कर्मप्रधान आहे की ते कुठेही उगवल्याशिवाय राहू शकत नाही. जे काही आहे ते आपलं तुम्हा आम्हा सर्वांच आहे.महाराजांचे गुणगाण आज सर्वच गातात पण त्यांचा आदर्श मात्र कुणी घेत नाहीत(८०%).हिच खरी शोकांतीका आहे.आमच्या बरोबर शिवप्रेमी येण्याच कारण म्हणजे महाराजांप्रती असलेली आस्था,प्रेम…आणि हो आमच्यात मी कोण असा कुणीच नाही खरतर हे सागांयची गरजच नाहीये. सारेच शिवप्रेमी महिला, पुरुष, युवक, युवती, त्याच बरोबर रीदान, श्लोक, आर्या,जीया हि तर पाच वर्षा आतील चिल्ली पिल्ली पण पुढची पिढी.....ते घडवन्याचं कार्य तुम्हा आम्हा सर्वानाच करणे आहे शेवटी ती तुमचं अणुकरण करुनच घडत असतात. जे पेराल तेच उगवत असतं... जीजाऊंनी शिवराय घडवले ते कलर टिव्ही पाहून नाही. माफ करा पण पुर्वि बाई गरोदर असताना शुरांची चरीत्र,ग्रंथ,वांगमय वाचीत होत्या. मुलांनवर संस्कार हे जीतके समाजात घडत असतात त्याच्याहुन अधीक आईच्या उदरात घडत असतात हे माझं ठाम मत आहे नव्हे तो माझा अनुभव आहे...आता बाईला टिव्ही सुटत नाही.आणि त्यात बाहेरच्या समाजात तमोगुणी, चंगळवादि माणसांची संख्या वाढली परीणामी प्रोडक्शन खराब.कुठल्याही समुहाबरोबर पहिल्यांदाच जात असाल आणि परतेपर्यंत जर अलीप्त राहत असाल तर कुठेतरी मी या शब्दाने जन्म घेतलाय हे निच्छित.. त्याचं तुम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.कसं आहे ना आंब्याच झाड सर्वाणांच माहीत आहे त्याला मोहोर येतो बहर येतो आंबे येतात सारं काही मजेत चाललेल असतं अचानक काही दिवसांनी त्या झाडावर दुसरं एक झाड दिसू लागतं. ते हि सुंदर साजेसं.त्यालाही फळं येतात ती आपण खातो.लहान जरी असली तीतकीच मधुर असतात ती.पण हळु हळु ते झाडावर आलेलं, मातीशी न जुळलेलं झाड आपलं वर्चस्व प्रस्तापीत करतं आणि पाहता पाहता आंब्याच्या झाडाच रुपांतर एका वेगळ्याच झाडात झालेलं असतं.कालांतराने त्याची मुळं जमीनीत नसल्या कारणाने तेही उद्वस्त होतं.तो स्वत्ःही शेष झाला आणि आंब्यालाही शेष केलं.आमच्या ईथे त्या झाडाला बटांगली अश्या नावाने संबोधतात. तात्पर्य काय तर कुणिही आपल्यावर वर्षस्व करता कामा नये परीणामी आपणही जाणार अन् तोही तुम्ही कृतज्ञशील असावं पण समेरचा निष्ठावान असेल तर ….महाराजांपाशी निष्ठावंत माणसं होती त्याला महत्वाचं कारण म्हणजे महाराज कृतज्ञशील होते,स्वतःसाठी ते जगलेच नाहीत जे काही ते सारं स्वराज्यासाठी… ईतिहास नव्याने सांगायची गरज नाही…..

आम्ही सारेजण संध्याकाळी ५.३० ला पायथ्याशी वाडा कुंभरोशी गावात विश्रांतीगृहापाशी पोहचलो. आनंद दादा (नेकदिल महाराजांचा निष्ठावंत मावळा) हि खाली आले होते. त्याचं वास्तव्य गडावरच असतं… त्यानी कार्यक्रमाची पुनःचा रुपरेषा सांगीतली नी आम्ही फ्रेश होउन ६च्या आसपास किल्ले प्रतापगडावर पोहचलो किल्ले प्रतापगडावर ३५५ मशाली तटबंदीला लावून त्या सज्ज झाल्या होत्या. आम्हीही शिवप्रताप बुरुजावर आकाशात नृत्य करण्यासाठी,अताषबाजी करण्यासाठी फटाके घेउन आलोच होतो.तत्पुर्वी सारेजण लगबगीने अंधार होण्याच्या

आधी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी थेट वर केदारेश्वर मंदिराच्या ऊजव्या बाजुस असणार्या हिरव्या उद्यानात गेलो.तो पर्यंत सुर्य ही अस्ताला गेला होता.महाराजांचा पुतळा पाहून परत पायर्‍यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे कूच केली मंदिरात प्रवेश करताच आपल्याला भवानीमातेची सालंक्रुत प्रसन्न मूर्ती दिसते. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली आहे या मूर्ती शेजारीच महराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव
मोहिते यांची तलवार ही दृष्टिस पडते.त्या मंदिराचा कळस आजही सव्वा किलो सोन्यानी त्याच थाटात नटलेला आहे. दर्शन घेऊन आम्हास जीतू आणि सुदेशने आप्पांची ओळख करुन दिली. प्रतापगडावरील सोहळा त्यांच्या देखरेखे खालीच होतो
नेहमी प्रमाणे प्रतापगड स्वराज्य ढोलपथक मंदिराबाहेरील प्रांगणात सुर धरु लागला.तुतारी,ढोल
ताशांचा आवाज गगणाला भिडू लागला.अंगा अंगात रोमांच प्रस्थापीत होऊ लागलं…!! चैतन्य ऊसळू लागलं…!!
खासे पंचवीस मावळे पायरयांच्या दुतर्फा उभे राहून मशाली पेटवल्या गेल्या. त्यात आम्हिच १६ जण होतो हि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट
होती.पेटत्या माशाली घेऊन आम्ही शिवप्रताप बुरुजाकडे धावले. सुरवातीला तोफेच्या गगणभेदि आवाजाने अवघा प्रतापगड परीसर दुमदुमून गेला ढोल ताशांनीही त्या अविस्मरणीय क्षणाचा साक्षी होण्यासाठी सर्वोच्च शिखर गाठलं . शिवप्रताप बुरुज ते भवानीमाता मंदिर या संपूर्ण तटबंदीला मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. सुरुवातीला त्यानंतर
“जय भवानी जय शिवराय”…..!!
“हर हर महादेव”….!!
” प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक , कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज, हिंदूपदपादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय “….!!!
या जयघोषाने गडकोट आसमंत दणाणून गेला. शिवप्रताप बुरजावरून यंदा प्रथमच भव्य प्रमाणात फटाक्याची अताषबाजीने आसमंती अग्णि नृत्य गजबजु लागलं.खाली खानाच्या कबरेतील मातीलाही घाम फुटावा असा देदिप्यमान सोहळा साजरा होत असताना फक्त साक्षीदारच नव्हे तर मशाल प्रज्वलीत करण्याचे अताषबाजी करणयाचे आम्हास भाग्य मिळाले.पुण्हा वर येउन अंगातील शिवसंचार ठोल ताशाच्या गजरात थीरकण्यास प्रोत्साहीत करत होता…
तदनंतर वेळ होती प्रसाद वाटण्याची. आई भवानीचा प्रसाद ( जेवण ) प्रत्येक भक्तापर्यंत आवडीनं गोडीनं पोहचवण्याच काम आम्हीही आवडीने करत होतो.शिवभक्ताचा उत्साह प्रत्येकाच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता.गतवर्षीपेक्षा यंदा शिवभक्तांची संख्या बरयाच प्रमाणात वाढली होती.पुढेही वाढत राहील शंका नाही…ज्याने एकदा का सोहळा पाहिला तर त्याला पुन्हा त्याचा मोह आवरता येणार नाही हे निच्छित….गर्दि जशी ओसरु लागली तसा आम्हीही प्रसाद भक्षण करण्यास मंदिराच्या प्रांगणात जेवण घेउन बसलो. जीतु,अमोल,सुदेश,अंकुरआणि मी…बाकीच्यांच आधीच आटोपलं होतं आमचं संपेस्तोवर आनंद दादाही येउन आमच्यापाशी जेवणासाठी बसले…
आई भवानीची महाआरती नंतर गोंधळाला सुरवात होणार होती.तत्पुर्वी सांगली येथील कलाकारांनी हलगी वाद्याचे सादरीकरण केले.
एक नवीनच कला पाहण्यास मीळाली त्यानंतर छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला.त्यात ईतर
शिवप्रेमींबरोबर स्वास्तिक आणि धनसारकर समुहानी नवरात्रउत्सवात केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता चिन्ह देण्यात आलं ते सर्वांच्या वतीने जीतुने स्विकारलं.आपण काहीही समाजासाठी केल्याची समाजाकडून पावती मीळत असते.त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय स्वराज्याच्या प्रतापगडावरुन आला.असो…आपण आपलच कौतुक करणे म्हणजे अधोगतीला जाणं हा माझा सिधांत्त अाहे
गोंधळाला सुरवात झाली आणि पुन्हा अंगात एक वेगळच चैतन्य सळसळू लागलं..हे अनुभवावं लागतं …त्याचं शब्दात वर्णन मला जमतय की नाही ते ही मी सांगु शकत नाही..पण एका वेगळ्याच विश्वात आपण दंग झालेलो असतो.शिवकालीन जगाचा आभास कुठेतरी हावी झालेला असतो.आई अंबेचा गोंधळ हातात पेटत्या मशाली…मंत्रमुग्ध झालेला आई भवाणीचा प्रांगण.त्या प्रांगणात शिवप्रेमींची ओसंडून वाहणारी गर्दि…संबळाच्या ताळावर फीरकणारे पाय, आधुनीक युगाची जोड म्हणाल तर तो क्षण टिपण्यासाठी डोकावणारया मोबाईलरुपी नजरा….त्याचाही मनसोक्त आस्वाद घेउन परतीचा मार्ग धरला सकाळी महाबळेश्वरच्या निसर्गसानिध्यात जाण्याचे ठरले होते…पाय परतीच्या दिशेने निघन्यास ऊत्सुक नव्हते पण पर्याय नव्हता.
अशीच कृपा आम्हावर सदैव रहावी हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना….
शब्दात वर्णन करणं अशक्यच…खरं म्हणायचं झालं तर मला शब्द अपुरे पडतायेत किव्हा सुचत नाहीयेत म्हणा…
जगदंब……
जय शिवराय …..
..........नितेश पाटील
Website : - niteshpatil715.wordpress.com