सस्नेह जय शिवराय ३१.७.२०१५ निज आषाढ पौर्णिमा
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
आताच्या ह्या कलयुगात कुणाला गुरु मानाव हेच कळेनास झालय.जो तो स्वःताच्या स्वार्थासाठी काहीही करायला बसलाय.आई बाबा आणि संत सोडुन तुमचं भलं होईल अस जगाच्या पाठीवर कुणालाही वाटत नाही आणि वाटनारही नाही.म्हणुन ह्या आताच्या गचपणावर माझा तरी विश्वास नाहीये
संतसंग सर्व काळ ! अखंड प्रेमाचा कल्लोळ....
.....श्री.तुकोबाराय
गुरु आपल्याला देव जवळ करण्याचा मार्ग दाखवत असतात.अर्थात जगण्याचा... आणि आपण आपल्याला सुख, शांती, समाधान मिळावं ह्यासाठी देवाला विनवित असतो. ह्या जगात सुःखी,शांती,आणि समाधानी असा कुणीच सापडनार नाही म्हणजेच परमेश्वर सापडनार नाही हे जरी खरं असलं तरी ह्या तिन्ही गोष्टींची आस सोडली तर परमेश्वर प्राप्ती निच्छीत होईल.असा आपला ईतीहास सांगतो.साधु संतानी थोर महापुरषानी विषय सुःख सोडलं म्हणुन आज त्याच्या बाबतीत ऊत्तमची ऊरे.थोर साधुसंताच्या महापुरषांच्या जिवनचरीत्रावर लक्ष टाकल तर आपल्या लक्षात येईल.आणि आपलं समाधान ते कशात तर बहुतांशी आपल्यापुर्ती मर्यादित.आणि परमेश्वराच्या समाधानासाठी म्हणा का आपल्या सुःखासाठी म्हणा...
लोकं म्हणतात की, आंम्ही श्रावणात नेहमी नवनाथ लावतो, ज्ञानेश्वरी वाचतो, भागवत वाचतो.
तरीही लोकांच्या मनात मानवता का निर्माण होत नाही हो....
याचं उत्तर हे आहे की.....
लोकं फक्त वाचतात, फक्त प्रक्रीया पुर्ण करतात. वाचणाचे चिंतन आणि मनन लोकं करत नाहीत......म्हणूनच आपली ही आज दुर्दशा झालेली आहे.. आणि देव काय अंधारात काळा गाॅगल लावुन बसलेला नाहीये तर त्याला काही दिसनार नाही.माणसाने विषयाची वासना सोडुन देऊन जे आहे त्यात समाधानी राहीलं पाहीजे तरच त्याला गुरुचे विचार पटु शकतात आणि परमेश्वर प्राप्ती ...जाऊद्या
असो
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण । गुरुसी आले अपाऽऽरपण । अवघे विश्व गुरु दिसे ।
संत एकनाथांनी असं म्हटलय नि खरच आहे ते !
म्हणूनच माता-पिता-बंधु-भगिनी-शिक्षक-मित्र-मैत्रिणी-स्नेही-सखे-सोबती-आप्तेष्ट-गणगोत-देव-ऋषि-संत ईत्यादि सर्व मी सद्गुरु मानतो.
म्हणूनच गुरुपौर्णिमेनिमीत्त आपणासर्वांस सस्नेहे, सानंद, सिदर शिरसाष्टांग नमस्कार.
कधी, काही चुकलं माकलं तर या मूढ माणसाला सांभाळून घ्या....
.
नितेश पाटील