Sunday, October 18, 2015

प्रतापगड मशालमहोत्सव २०१५

सस्नेह जय शिवराय                                                                               नितेश पाटील  ९६३७१३८०३१
प्रतापगड मशाल महोत्सव २०१५                                                                   १६/१७ .१०.२०१५
सस्नेह जय शिवराय
प्रतापगड मशालमहोत्सव शुक्रवार दि.१६.१०.१५
मंत्रमुग्ध करणारा देदिप्यमान सोहळा……
खरं सांगायच तर श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने, त्यांच्या पराक्रमाणे पावन झालेल्या गड किल्ल्यांवर फिरणे हे कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा माझ्यासाठी जास्तच .त्याच्या सानिध्यात गेल्यावर जर महाराजांचा ईतिहास तुम्हाला माहीत असेल ( नसेल तर महाराष्ट्रात जगणं सोडुन द्यावं ) तर अंगावर रोमांच( हातावरचा केस न केस त्या परमेश्वरास नमन करण्यासाठी ऊभा राहतो ) उभं राहील्या शिवाय राहणार नाही.महाराजांचा ईतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचे पराक्रम, त्यांच शासन… त्यांच्यासाठी, स्वराज्यासाठी वेळी मरणास तत्पर असणारे निस्वार्थी एकनिष्ठ १००स१ असे या मातीशी प्रामाणिक असणारे कैक मावळे, त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य , हे स्वराज्य व्हावे हि त्या काळी श्री ची ईच्छा होती. आणि त्यासाठी आपले सर्वस्व स्वराज्यासाठी अर्पण करणारा मंत्रमुग्ध होणारा समाज होता.आताही असेल पण फरक आहे आता श्रीला जान्हवीच्या मागे लावलयं.ते पाहण्यात समाज ईतका गुंग झालाय कि श्री ला ही काहिहि म्हणु लागले.समाज ईतका अधोगतीला का चालला हे कदाचीत मला सांगता येणार नाही .सण सोहळ्यांची दुर्दशा करुन टाकली.त्याला अपवाद असतात हे पारंपारीक, सांस्कृतीक,देदिप्यमान सोहळे.
आज मीच लीहलेल्या काही ओळी ईथे नमुद करु ईच्छीतो

सण सोहळे

गाव एक अन् ऊत्सव अणेक
सण सोहळ्यांची का झाली दशा
कोणी केली त्यांची दुर्दशा...
प्रतिष्ठा मिरवणारी पिढी
राजकारण करणारी समाजप्रवृत्ती
असेल काही प्रमाणात मी ही...
सण म्हणजे करमणुक नाही
सण म्हणजे खेळ नाही
तुझा मोठा की माझा मोठा
तो काही घर बंगला नाही
आपापसात तु झगडत राहिला
चंगळवादि समाज वाढू लागला
का विसरला माणूस सणांचा
शुद्ध, सात्विक हेतू , मतितार्थ...
सज्जन समाज शोकात राहीला
दुर्जन समाज जोमात वाढला
जाण ती संस्कृतीची का धरु नये
स्पर्धेपायी पिढी ऊगा नासवू नये
अमुल्य अपुल्या सण, ऊत्सव, परंपरा 
अनादिकाळची प्रथा नासवू नये....
.............नितेश पाटील २९.९.१५
असो माझं हे असं होतं आपण कुठं होतो…..?


प्रतापगडाचा संक्षिप्त ईतिहास ……
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.


प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला ३५५ वर्षे पूर्ण झाली. प्रतापगड वासिनी जगदंबा आई भवानी मातेच्या मंदिराला ३५० वर्षे झाल्यापासून हा कार्यक्रम नवरात्रीमधील चतुर्थीला साजरा केला जातो. यंदा पहिली माळ दोन वेळेस आल्यामुळे हा कार्यक्रम अश्वीन शुद्ध तृतीयेस मोठ्या ऊत्साहात , जल्लोशात,पारंपारीक ,सांस्कृतीक पध्दतीने पार पडला. गत वर्षीप्रमाणे यंदाही आम्हास मशाल प्रज्वलीत करण्याचा सहभाग मिळाला.धन्य जाहलो…यंदा आम्हा पालघर धनसारकरांची ऊपस्तीथी ऊल्लेखनियच होती.गतवर्षी दहा जण,त्याच्या आधी  पाच जण आणि यंदा तब्बल साठ जण…ज्या वर्षी पहील्यांदा पाच जण गेले होते त्यात सुदेश, जीतु आणि त्यांचे मित्र पण त्यांच अहोभाग्य म्हणजे महाराजांचा ईतीहास ज्यांनी जीवंत केला घराघरात, प्रत्येकाच्या ह्रुदयात वसवला ते महान व्यक्तीमत्व गडावर उपस्थीत होते...मी काय वर्णू त्यांना तो माझा घास नाही. आत्ताच त्यांना महाराष्ट्रभुषन म्हणुन सन्मानीत करण्यात आलं त्यानिमीत्ताने काही ओळी लीहल्या होत्या...

महाराष्ट्र भूषण " शिवचरित्राचे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे)

मी काय वर्णावे त्यांसी साहित्यिकांचा सन्मान पुरंदरे
शिवनेरीच्या शिवरायांनी झपाटले ते पुरंदरे
भक्तिमार्गावर ज्ञानदीपचा प्रकाश  ते पुरंदरे
ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेले ते पुरंदरे
इतिहासातुन राष्ट्राचे शील शोधले ते पुरंदरे
शिवचरित्र एकमेव जीवितधेय्य साकारले ते पुरंदरे
शिवचरित्र लिहताना अखंड सावधान ते पुरंदरे
भूतकाळाचा अर्थ समजून इतिहास सांगणारे ते पुरंदरे
अंतकरणात कवी मोहरबंध गोंडेदार ते पुरंदरे
इतिहास संशोधन हे शास्त्र त्यांसी ते पुरंदरे
अंगाअंगावर रोमांच स्थापित करावे ते पुरंदरे
शिवसाक्ष पत्रासाठी प्रलयपाउस सहनारे ते पुरंदरे
भाषेच्या अंगातून अलगद ओसंडून जाणारे ते पुरंदरे
तपशीलांवर पकड़ ती भलतीच कडक ते पुरंदरे
शिवचरित्र आठवित पावले शोधत फिरले ते पुरंदरे
कालवस्त्रा दूर सारुन इतिहास दर्शन घडवणारे पुरंदरे
दिले आयुष्य मिळवले शिवचरित्र धन ते पुरंदरे
लोकशाहिला अत्यंत पोषक भूमिका देणारे पुरंदरे
किती निराशा,किती अपमान तरी न डगमगले ते पुरंदरे
अखेर महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित झाले ते बाबासाहेब पुरंदरे...

नतमस्तक मी तया चरणी उदात्त उदार ते पुरंदरेनितेश पटील २०.८.१५

समाज निच्छीतच जागृत असतो. कुणालातरी पुढाकार घ्यावा लागतो. पण तो पुठाकार घेत असताना मी पणाची जाणीव त्याच्या ह्रुदयात वास करता कामा नये.ती नव्हती अन् कधी राहणारही नाही जो महाराजांचा होईल तो तो जणतेचा निच्छितच होईल यात तिळमात्र शंका नाही.ते बिजच ईतकं कर्मप्रधान आहे की ते कुठेही उगवल्याशिवाय राहू शकत नाही. जे काही आहे ते आपलं तुम्हा आम्हा सर्वांच आहे.महाराजांचे गुणगाण आज सर्वच गातात पण त्यांचा आदर्श मात्र कुणी घेत नाहीत(८०%).हिच खरी शोकांतीका आहे.आमच्या बरोबर शिवप्रेमी येण्याच कारण म्हणजे महाराजांप्रती असलेली आस्था,प्रेम…आणि हो आमच्यात मी कोण असा कुणीच नाही खरतर हे सागांयची गरजच नाहीये. सारेच शिवप्रेमी महिला, पुरुष, युवक, युवती, त्याच बरोबर रीदान, श्लोक, आर्या,जीया हि तर पाच वर्षा आतील चिल्ली पिल्ली पण पुढची पिढी.....ते घडवन्याचं कार्य तुम्हा आम्हा सर्वानाच करणे आहे शेवटी ती तुमचं अणुकरण करुनच घडत असतात. जे पेराल तेच उगवत असतं... जीजाऊंनी शिवराय घडवले ते कलर टिव्ही पाहून नाही. माफ करा पण पुर्वि बाई गरोदर असताना शुरांची चरीत्र,ग्रंथ,वांगमय वाचीत होत्या. मुलांनवर संस्कार हे जीतके समाजात घडत असतात त्याच्याहुन अधीक आईच्या उदरात घडत असतात हे माझं ठाम मत आहे नव्हे तो माझा अनुभव आहे...आता बाईला टिव्ही सुटत नाही.आणि त्यात बाहेरच्या समाजात तमोगुणी, चंगळवादि माणसांची संख्या वाढली परीणामी प्रोडक्शन खराब.कुठल्याही समुहाबरोबर पहिल्यांदाच जात असाल आणि परतेपर्यंत जर अलीप्त राहत असाल तर कुठेतरी मी या शब्दाने जन्म घेतलाय हे निच्छित.. त्याचं तुम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.कसं आहे ना आंब्याच झाड सर्वाणांच माहीत आहे त्याला मोहोर येतो बहर येतो आंबे येतात सारं काही मजेत चाललेल असतं अचानक काही दिवसांनी त्या झाडावर दुसरं एक झाड दिसू लागतं. ते हि सुंदर साजेसं.त्यालाही फळं येतात ती आपण खातो.लहान जरी असली तीतकीच मधुर असतात ती.पण हळु हळु ते झाडावर आलेलं, मातीशी न जुळलेलं झाड आपलं वर्चस्व प्रस्तापीत करतं आणि पाहता पाहता आंब्याच्या झाडाच रुपांतर एका वेगळ्याच झाडात झालेलं असतं.कालांतराने त्याची मुळं जमीनीत नसल्या कारणाने तेही उद्वस्त होतं.तो स्वत्ःही शेष झाला आणि आंब्यालाही शेष केलं.आमच्या ईथे त्या झाडाला बटांगली अश्या नावाने संबोधतात. तात्पर्य काय तर कुणिही आपल्यावर वर्षस्व करता कामा नये परीणामी आपणही जाणार अन् तोही तुम्ही कृतज्ञशील असावं पण समेरचा निष्ठावान असेल तर ….महाराजांपाशी निष्ठावंत माणसं होती त्याला महत्वाचं कारण म्हणजे महाराज कृतज्ञशील होते,स्वतःसाठी ते जगलेच नाहीत जे काही ते सारं स्वराज्यासाठी… ईतिहास नव्याने सांगायची गरज नाही…..

आम्ही सारेजण संध्याकाळी ५.३० ला पायथ्याशी वाडा कुंभरोशी गावात विश्रांतीगृहापाशी पोहचलो. आनंद दादा (नेकदिल महाराजांचा निष्ठावंत मावळा) हि खाली आले होते. त्याचं वास्तव्य गडावरच असतं… त्यानी कार्यक्रमाची पुनःचा रुपरेषा सांगीतली नी आम्ही फ्रेश होउन ६च्या आसपास किल्ले प्रतापगडावर पोहचलो किल्ले प्रतापगडावर ३५५ मशाली तटबंदीला लावून त्या सज्ज झाल्या होत्या. आम्हीही शिवप्रताप बुरुजावर आकाशात नृत्य करण्यासाठी,अताषबाजी करण्यासाठी फटाके घेउन आलोच होतो.तत्पुर्वी सारेजण लगबगीने अंधार होण्याच्या

आधी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी थेट वर केदारेश्वर मंदिराच्या ऊजव्या बाजुस असणार्या हिरव्या उद्यानात गेलो.तो पर्यंत सुर्य ही अस्ताला गेला होता.महाराजांचा पुतळा पाहून परत पायर्‍यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे कूच केली मंदिरात प्रवेश करताच आपल्याला भवानीमातेची सालंक्रुत प्रसन्न मूर्ती दिसते. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली आहे या मूर्ती शेजारीच महराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव
मोहिते यांची तलवार ही दृष्टिस पडते.त्या मंदिराचा कळस आजही सव्वा किलो सोन्यानी त्याच थाटात नटलेला आहे. दर्शन घेऊन आम्हास जीतू आणि सुदेशने आप्पांची ओळख करुन दिली. प्रतापगडावरील सोहळा त्यांच्या देखरेखे खालीच होतो
नेहमी प्रमाणे प्रतापगड स्वराज्य ढोलपथक मंदिराबाहेरील प्रांगणात सुर धरु लागला.तुतारी,ढोल
ताशांचा आवाज गगणाला भिडू लागला.अंगा अंगात रोमांच प्रस्थापीत होऊ लागलं…!! चैतन्य ऊसळू लागलं…!!
खासे पंचवीस मावळे पायरयांच्या दुतर्फा उभे राहून मशाली पेटवल्या गेल्या. त्यात आम्हिच १६ जण होतो हि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट
होती.पेटत्या माशाली घेऊन आम्ही शिवप्रताप बुरुजाकडे धावले. सुरवातीला तोफेच्या गगणभेदि आवाजाने अवघा प्रतापगड परीसर दुमदुमून गेला ढोल ताशांनीही त्या अविस्मरणीय क्षणाचा साक्षी होण्यासाठी सर्वोच्च शिखर गाठलं . शिवप्रताप बुरुज ते भवानीमाता मंदिर या संपूर्ण तटबंदीला मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. सुरुवातीला त्यानंतर
“जय भवानी जय शिवराय”…..!!
“हर हर महादेव”….!!
” प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक , कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज, हिंदूपदपादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय “….!!!
या जयघोषाने गडकोट आसमंत दणाणून गेला. शिवप्रताप बुरजावरून यंदा प्रथमच भव्य प्रमाणात फटाक्याची अताषबाजीने आसमंती अग्णि नृत्य गजबजु लागलं.खाली खानाच्या कबरेतील मातीलाही घाम फुटावा असा देदिप्यमान सोहळा साजरा होत असताना फक्त साक्षीदारच नव्हे तर मशाल प्रज्वलीत करण्याचे अताषबाजी करणयाचे आम्हास भाग्य मिळाले.पुण्हा वर येउन अंगातील शिवसंचार ठोल ताशाच्या गजरात थीरकण्यास प्रोत्साहीत करत होता…
तदनंतर वेळ होती प्रसाद वाटण्याची. आई भवानीचा प्रसाद ( जेवण ) प्रत्येक भक्तापर्यंत आवडीनं गोडीनं पोहचवण्याच काम आम्हीही आवडीने करत होतो.शिवभक्ताचा उत्साह प्रत्येकाच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता.गतवर्षीपेक्षा यंदा शिवभक्तांची संख्या बरयाच प्रमाणात वाढली होती.पुढेही वाढत राहील शंका नाही…ज्याने एकदा का सोहळा पाहिला तर त्याला पुन्हा त्याचा मोह आवरता येणार नाही हे निच्छित….गर्दि जशी ओसरु लागली तसा आम्हीही प्रसाद भक्षण करण्यास मंदिराच्या प्रांगणात जेवण घेउन बसलो. जीतु,अमोल,सुदेश,अंकुरआणि मी…बाकीच्यांच आधीच आटोपलं होतं आमचं संपेस्तोवर आनंद दादाही येउन आमच्यापाशी जेवणासाठी बसले…
आई भवानीची महाआरती नंतर गोंधळाला सुरवात होणार होती.तत्पुर्वी सांगली येथील कलाकारांनी हलगी वाद्याचे सादरीकरण केले.
एक नवीनच कला पाहण्यास मीळाली त्यानंतर छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला.त्यात ईतर
शिवप्रेमींबरोबर स्वास्तिक आणि धनसारकर समुहानी नवरात्रउत्सवात केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता चिन्ह देण्यात आलं ते सर्वांच्या वतीने जीतुने स्विकारलं.आपण काहीही समाजासाठी केल्याची समाजाकडून पावती मीळत असते.त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय स्वराज्याच्या प्रतापगडावरुन आला.असो…आपण आपलच कौतुक करणे म्हणजे अधोगतीला जाणं हा माझा सिधांत्त अाहे
गोंधळाला सुरवात झाली आणि पुन्हा अंगात एक वेगळच चैतन्य सळसळू लागलं..हे अनुभवावं लागतं …त्याचं शब्दात वर्णन मला जमतय की नाही ते ही मी सांगु शकत नाही..पण एका वेगळ्याच विश्वात आपण दंग झालेलो असतो.शिवकालीन जगाचा आभास कुठेतरी हावी झालेला असतो.आई अंबेचा गोंधळ हातात पेटत्या मशाली…मंत्रमुग्ध झालेला आई भवाणीचा प्रांगण.त्या प्रांगणात शिवप्रेमींची ओसंडून वाहणारी गर्दि…संबळाच्या ताळावर फीरकणारे पाय, आधुनीक युगाची जोड म्हणाल तर तो क्षण टिपण्यासाठी डोकावणारया मोबाईलरुपी नजरा….त्याचाही मनसोक्त आस्वाद घेउन परतीचा मार्ग धरला सकाळी महाबळेश्वरच्या निसर्गसानिध्यात जाण्याचे ठरले होते…पाय परतीच्या दिशेने निघन्यास ऊत्सुक नव्हते पण पर्याय नव्हता.
अशीच कृपा आम्हावर सदैव रहावी हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना….
शब्दात वर्णन करणं अशक्यच…खरं म्हणायचं झालं तर मला शब्द अपुरे पडतायेत किव्हा सुचत नाहीयेत म्हणा…
जगदंब……
जय शिवराय …..
..........नितेश पाटील
Website : - niteshpatil715.wordpress.com

Thursday, October 8, 2015

डोंगर यात्री - हरीशचंद्र गड


 सस्नेह जय शिवराय                                                                               नितेश पाटील  ९६३७१३८०३१
हरिशचंद्र गड पदभ्रमण trek    गिर्यारोहण                                                                   १/२/३.१०.२०१५

भिमा शंकर नंतर पुन्हा एकदा यावर्षीचा दुसरा ट्रेक.... 
डोंगरयात्री समुहाबरोबर हरीशचंद्र गड वाया पाचनई भटकंती करण्याचा योग आला....
दिनांक १ /२ /३.१०.१५   ग्रुप लीडर = वृंदावन करावडे(कुर्ला)
बाकी सर्वही होतेच ..सुजाताई, शुभांगीताई, अनिल भाई,  बंड्या भाई,परेश, एकूण २१ जण....
     भीमाशंकरचं वर्णन मी मागे केलेलंच आहे. निसर्गाच्या सानिध्यात पदभ्रमण करीत फिरण्यात वेगळीच मजा...हा मात्र ती अनुभवावी लागते.....तो आस्वाद घ्यावा लागतो....काॅंक्रेटच जग सोडून निसर्गाच्या जगात जावं लागतं.... गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिशचंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे...डोंगरयात्री समुहाचे आभार कि त्यांनी आम्हाला त्यांच्या समूहामध्ये सहभागी करून घेतलं ..आता आम्ही पालघर कर जरी असलो तरी आम्हाला वेगळपण वाटत नाही.ज्या प्रमाणे हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी ४\५ वाटा आहेत .पाचनाइ,साधले घाट,खिरेश्वर,बेलपाडा ,कोतुल,आणि नलीची वाट..... कुठूनही गेलं तरी थोद्याफार फरकाने गडावर पोहचता येते .त्याप्रमाणे मुंबईकर काय,पालघरकर काय किव्हा आणि काय शेवटी समूह महत्वाचा डोंगरयात्री ......
       गडाची ऊँची १४२४मीटर , म्हणजे ४६७१ फुट उंच .पायवाटेवरून जाताना जंगलातील हिरवी गर्द वनस्पती त्यांवर फुललेली रंगबेरंगी टवटवीत फुलं उंच झाडावरून आपलं अस्तित्व दाखवत असतात, तर काही फुलं गवतात लपलेली असतात. गडावर गेल्यानंतर हरिशचंद्राच्या मंदिरावरील अप्रतिम नक्षीकाम, केदारेश्वराच्या गुहेत थंड पाण्याने वेढलेले भव्य शिवलिंग तसेच अन्य गुहा, रौद्रभीषण कोकणकडा व तेथून दिसणारा सूर्यास्त पाहून हरखून जाणार दृष्य. रात्री आकाश निरीक्षणाचा वेगळाच आनंद , आकाशगंगा, ध्रुवतारा, सप्तर्षी यासह विविध तारकामंडले , थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी ,नाच, गाणी म्हणत सर्वांनी रात्र जागवने . दुसर्‍या दिवशी हरिशचंद्रगडावरूनच कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, जीवधन या गडांचे व माळशेज घाटाचे दर्शन (निसर्ग आपल्यावर मेहरबान असेल तर )घेत  गडावरून खाली उतरता  येत .या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे, खोल द-या, उरात धडकी भरविणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडविणारी देखणी मंदिरे, लेणी समूह. येथेच महायोगी चांगदेवांनी 'तत्त्वसार' या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली .असं ऐकण्यात आलं.मंदिर परिसरातील काही शिलालेख हि आहेत. सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत, परंतु हरिशचंद्राचा हा थोरला कडा म्हणजे सृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्नच म्हणाव लागेल....!
  हरिशचंद्र गडाच म्हणाल तर 


निसर्गाने नटलेल्या गडावर खास करुन पावसाळ्यात पदभ्रमण करीत जाणे हा वेगळाच अणुभव. भीमाशंकर परतीच्या वेळी पुढची ट्रेक हरिशचंद्र गडाची असेल हे ठरलं होतं. तारीख मात्र निश्चित नव्हती..काही दिवसांनी ती हि निश्चित झाली . उत्सुकता होतीच, आणि ठरलेही होते दोन दिवसांचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे गुरुवार दि. १.१०.२०१५ रात्री पालघरहून आम्ही ५ जन ८.४० च्या  शटलने  रवाना झालो.परेश,सुदेश,अजय,अंकुर तुषार,मी आम्ही
पालघरहून आणी विरेन आणि संदीप भाऊ दहाणुहून.... .११.३१ ला आम्ही दादर ला पोहचलो ..या वेळेस बसने टेम्पो (larvaler) जायायचे ठरले होते. बस काही वेळेवर आली नाही आम्ही अर्धा तास उशिरा जाऊनही. मग काय अनिल भाऊ भेटले ..जाऊन हॉटेल मध्ये नास्ता करायला बसलो तितक्यात वाजला फोन ..तो कधीही वाजू शकतो ...मुळात त्याच कामच ते आहे म्हणा. पण तो वाजल्यानंतर माणूस बाकी नेमकं तेच बोलेल याची शास्वती कुणीही देऊ शकत नाही.....बर बस पोहोचल्याची बातमी कळली आणि घाईघाईने खाऊन निघालो ते थेट बसपाशी..१२ वाजून गेले होते तरी काही मंडळी यायची बाकी होती,ती हि मुंबईची आम्ही पालघरहून पोहचलो होतो बरं .....सारे जमले आणि पुन्हा
यावेळेसही भुवया उंचावल्या ...मागच्या वेळेस आर्या (७ वर्ष )छोटी होती आता तिच्याहून लहान श्रेयांस ( वय ४ वर्ष )   ...बंड्यादाचा छोटा मुलगा ..आणि मोठा आर्यन ११ वर्ष श्रेयांस बद्दल निश्चितच बरच काही सांगत येईल तत्पूर्वी मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही,तसाच काहीसा तो .... तसंच मुलांना जर अतिशय
कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात. परंतु
जर त्यांना खेळीमेळीने आणि त्यांना रुचेल अशा पध्दतीने म्हणजेच गोष्टींच्या आणि खेळांच्या
माध्यमातून शिकवले, तर हे संस्कार मुलांकडून लवकर आत्मसात केले जातात, मग हि मुल मुक्त अशा या
निरागस स्वातंत्र्याचा पुरेपुर अनुभव घेतात, स्वतःच्या कला जोपासतात, सामुहिक खेळांद्वारे इतर
मुलांशी मैत्रीचं निखळ नातं निर्माण करतात, मस्ती करतात, त्यांच्यात उपजत असलेल्या खेळकरपणाला आणि खोडकरपणाला अशा वेळी उधाणाच येतं, सुरवातीला अतिशय खोडकर असणारा मुलगा नंतर शांततेची गोडी चाखायला शिकतो, तर कधी अतिशय अंतर्मग्न राहणारा मुलगा शेवटी इतरांसारखाच दंगेखोर बनतो...असो आणि आम्ही एकूण १९ प्लस ३ चिल्ले पिल्ले असे २० जन  बसमध्ये बसलो  रात्री १२.३० वाजता  गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि निघालो...वाटेत आणखीन एकाची भर होऊन २१ जन झालो .प्रवीण हांडे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत पण शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते...तद्नंतर मुंबई आग्रा महामार्गे थेट कसारा २ .४५ ला खाली उतरलो ते बाबा दा धाबा ...चहा नास्ता काहीजण जेवलेही इतक्या रात्री ते विशेष...सरता सरता वेळ कशी निघून गेली ते काही कळल नाही. ६.०० वाजले होते माझी साखरझोपेची वेळ... डुलकी येणं स्वाभाविकच ....तितक्यात बस थांबली...जाग आली तर थंड हवेने व्यापून टाकलेला परिसर मन मोहून टाकणारा झऱ्याचा आवाज, मधूनच येणारा रातकिड्यांचा किर्रर्र आवाज ...सुखावलो  पण बस थांबण्याच कारण अजयला बस लागली होती .बहुतेक रात्री घेतलेल्या चहामुळे असेल.....


पुढे ३० मिनिटाच्या प्रवासानंतर कळसुबाई कमान मागे टाकून  पुढे जाऊन पाचनई गडाच्या पायथ्याशी पोहचलो. हॉटेल हरी ओम पाशी बस ठेऊन शरीर शुद्धी आणि चहाची चुस्की घेऊन निघण्याच्या तयारीत ...राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे.पाचनई ७० एक घरांच गाव आहे .नंतर ८.३० च्या ठोक्याला आमची  रिंगण बनवून ओळख परेड झाली.         वृंदावन करावडे (कुर्ला) दादानी मार्गदर्शन केलं ... सर्वाना सूचित करण्याची  तितकीच गरज भासली नाही .मार्ग सोपा होता आणि डोंगरयात्री ही बहुतांशी नेहमीचेच होते आम्ही तितके नवीन पण मागच्या महिन्यातच पदभ्रमण करून हि दुसरी वेळ म्हणून काहीसे रुळलेले  .तरीही येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये,चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.सर्वात महत्वाच म्हणजे कुणीही चुकीचं वर्तन करताना आढळल तर त्याला लागलीच मागे पाठवलं जाईल वैगरे ..


  पण पाऊस नव्हता म्हणजे चढताना दमछाक निघणार हे निश्चित होतं. ८.४५ ला चढण्यास सुरवात केली .या वेळेस मात्र पाण्यात भिजण्याची फार उत्सुकता होती .सारे जन एकत्रचगड चढण्याचे ठरले होते . उन आता वाढू लागलं होतं .त्यामुळे आणखीनच जीव कासावीस होत होता .कुठे एकदा पाणी मिळते
आणि मनमुराद त्यात चिंब होतो अशी काही साऱ्यांची मानसिकता झाली होती.पाचनई गावातून थोडे वर चढून आले की डोंगराची घळ नजरेत भरते. घळीला  वळसा घालुन पुढे जावे लागते. त्यातच चढण चढताना अंगावर येणा-या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांचा दोन थरांच्या मध्ये लाल हिरवी
राख सापडते. . यालाच भौगोलिक भाषेत 'रेड बोल' म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले. मोठमोठ्या भेगा पडल्या. भ्रंश झाले. त्यानंतर या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली.त्याचा आस्वाद घेत पुढे जात होतो .
    गडाच्या माथ्यावर गेल्यानंतर विस्तिर्ण, सपाट, घनदाट सदरहित झाडांनी वाढलेली तीन शिखरे येथे आहेत. पैकी एक शिखर तारामातीच्या पोटाशी आहे. नऊ ब्राम्हणी लेणी आणि इतर दोन शिखरांना हरिश्चंद्र, रोहिदास नावाने ओळखले जाते. हेमाडपंथी बांधणीच्या सप्ततीर्थात असलेल्या मंदिरामध्ये चौदा विष्णुमूर्ती, पश्चिमेकडून मंगळगंगेचा वाहणारा प्रवाह आणि त्यालगतचा सुमारे आठव्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे. येथील निसर्गसुंदर शिवस्थाने, गुंफा प्रेक्षणीय आहेत (गुगल)
    तितक्यात अर्धी चढण पार केल्यावर मंगळगंगा दृष्टीस पडली .१०.१५ वाजले होते. पाऊस नसल्याने त्याचा  वेग कमी होता. पण काचेसमान नितळ पाणी आणि त्यावर तरळणारे तरंग  ते पाहून मनात उठणाऱ्या अगणित लाटा, मन मोहून टाकणारं दृश्य ,थंडगार पाणी , मेजवानीच ....सारे तुटून पडले
.कुणालाही भिजण्याचा मोह आवरता आला नाही. वरून हवे त्या प्रकारचे प्रेक्षक बघण्यासाठी हजर होते. ट्रेकची हीच खासियत असावी .पण काहीही म्हणा (काहीही श्री आता जुनं झालं ) प्रत्येक ट्रेक चा अनुभव वेगळाच असतो . अर्धा पाऊन तास मनसोक्त भिजण्याचा आनंद घेवून पुढे निघालो.... अखेर १२ वाजता आम्ही वर पोहचलो. रातकिड्यांचा आवाज रात्री येण स्वभाविक आहे . पण दिवसा भर दुपारी किर्रर्र आवाजाने त्यांनी आसमंत दनाणून सोडला होता. हाही अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो .
       हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा
आहे. तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून
वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत आम्हीही त्यातीलच एका गुहेत राहिलो होतो. तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. ती काही पाहता आली नाही .या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे.
   
         मंदिराच्या पूर्वेला प्रशस्त तीर्थ कुंड आहे .२५ फुट खोल.. तीर्थकुंडात डिसेंबर अखेरपर्यंत पाणी असते. कुंडांच्या दक्षिणेला १४ देवळयांमध्ये १४ विष्णुमूर्ती विराजमान होत्या. त्यातील आता दोनच आहेत .देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली आहे  येथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तीर्थकुंडासमोर एक छोटेखानी मंदिर असून, काशीतीर्थ नावाने ते ओळखले जाते असं गावकऱ्यांच म्हणनं आहे.
      मुक्कामी तर पोहचलो होतो .वर येवून पूर्ण थकवाही निघून गेला होता. गुहेत सॅग व्यवस्थित ठेऊन ठरल्याप्रमाणे काहीजण रात्रीची जेवणाची सोय करण्यासाठी सरपाण आणायल काहीजण .......आणि आम्हीही कोकण कड्याकडे टोप आणण्यासाठी निघालो. अनिल,सुदेश,अजय,अशितोष,गौतमी आणि मी आम्हाला कुणालाही रस्ता माहीत नव्हता ...टेकडीवर चढुन खाली उतरलं की जवळ जवळ सरळच रस्ता आहे.२० ते २५ मिनिटं लागतात.तिथे भास्कराना आम्हास भेटून स्वयंपाकासाठी लागणारी टोप घ्यायची होती. भास्कर (मो.नं.०८३०८०८१९३९) म्हणजे तिथले स्थानिक . खाली पाचनईला त्याचं घर आहे आणि गडावरही आहे कोकण कड्यापाशी..
                                                             काय ते दृश्य पश्चिमेकडून दक्षिणेकडे पसरलेला
कोकणकडा निसर्गरम्य आहे. या कड्याची मुंबईच्या पर्यटकांनी १९८५ साली १ वर्ष ३ महिने अथक परिश्रम करून चढाई केली होती. इथे हिरव्यागार रंगाच्या छटा सर्वत्र दिसतात. आमच्या नशिबात मात्र ती मोकळी दरी पाहण्याचा योग नव्हता ...त्या दरीतून ढग च्या ढग वर येताना दृष्टीस पडत होते.धुकं म्हणता येणार नाही ढगच ते ....त्यांचं  साम्राज्य चाहुपाजुला पसरले
होते त्या शीतल मखमली चादरीने अंगावर काटे उभे राहत होते. मन प्रसन्न होते. ते  निसर्गाचे रौद्र पण सुंदर रूप पाहून मन मोहून जात. पश्चिमेकडून (दरीतून) वारा आला तर कड्याखाली टाकलेले कोणतीही वस्तू (उदा. टोपी, रुमाल,पाने फुले ) पुन्हा तेवढ्याच वेगाने दरीतून वर येते. झाडाची छोटी फांदी जरी वर आli तरी अनिल भाऊंनी खाली टाकलेला रुमाल मात्र वर आला नाही . म्हणतात ना शेवटी नशीब.....तेथून आम्ही पुन्हा खाली गुहेकडे परतलो. येताना सरपण हि आणलं .बाकीच्या मंडळीनीही लाकडाची सोय केली होती....तद्नंतर फ्रेश होऊन सर्वांनी आपापले बरोबर आणलेलं जेवण शेअर करून भरपेट झणझणीत जेवलो...कोलंबी,पापलेट,चिकन,ठेचा, पोळी, पुरी,पुलाव,चटणी,काय काय सांगावं आता अगदी पंच पक्वानाचा योग ....पंचतारांकित उपहारगृहाच जणू....हे मस्त असतं ना जितकी माणसं जास्त तितका मेनु जबरदस्त ..काहीही खा ते हि विनामुल्य ...नाही का ? काही वेळ विश्रांती णी मग वृंदा दा ,अनिल भौ ,गौतमी ने फक्कड चहा बनवला होता तो हि चुलीवर ..आहाहाहाहा लाजवाब....ती चुस्की घेतली नी निघालो कोकण कड्यापाशी पुन्हा.........
..आहाहाहा.....सह्याद्री म्हणजे काय याची कल्पना कोकणकडा पहिले की येते...!!!
     

पुन्हा कोकण कड्यावर जाण्यासाठी सारेजण निघालो .वृंदा दादा आणी काहीजण गुहेतच थांबले .वर जिथे जेवणाची सोय होती तिथे काही बैल ,गाई चारत होत्या...त्यातला एक चक्क माझ्या मागे लागला ना ...मी काही त्याला छेडल नव्हत तरीही ....फक्त १००च्या नोट(माझा मोबाईल) ने क्लिक मारत होतो ....पण मला वाटत त्याच्याही मनात आलं असेल.....

बहुतेक नोटीवर भुलन्या इतके आम्ही तरी नेभळट नाहीत...म्हणून मागे लागला असेल ...पुढे काही दिसत तर नव्हतच...त्यातच पुसटसे क्लिक मारले तितक्यात  जल हि तुषार बिंदू रूपाने अंगावर ओघळू लागले होते ....त्याच्या कवेत गुरफटन्याआधी तेथून आम्ही काढता पाय घेतला तो थेट गुहेपाशी...               
आता वेळ होती पंचतारांकित पाथीकाश्रमाच्या आवारात(गुहेच्या)जेवण बनविण्याची ...बाजूलाच हलकेच शीतल तितकंच नितळ झर्याचं पाणी संथ गतीने अलगद पडत होतं. चूल हि मांडून झाली ,सरपणहि तयार होते.माशालीही सज्ज झाल्या होत्या .menuहि तयार होता .अंडाकdi ,भात ,वरण....मदत करणारे आम्ही सारेच होतो पण आचारी म्हणाल तर चविष्ट, रुचकर आणि पोषक झणझणीत तीखट हि म्हणू शकता तुम्ही भोजन बनवण्याची कला शास्त्र पारंगत असलेला मुळचा उनभाटचा वाशीत राहणारा आचारी आशितोष...... जेवण झणझणीतच होतं. झकास.....जेवणाच्या आधी आणि नंतरही गाण्याची सुरेल
मैफिल सजली.... भेंडयांच्या सुरेल शाब्दिक तरंगाणी गुहेलाही पाझर फुटला असेल...इतकी मैफिल रंगत दार झाली .सारे जन झोपी गेले .रात्री गुहेत अंधारच होता  कारण दिवा विझवला होता.अचानक एक जन ओरडला ...पुन्हा भयाण शांतता ...तितक्यात परेश जोरात किंचाळला लागलीच चिंटू हि किंचाळला ..सारेजण एकाच दिशेने आवक झाले.काय झालं ते मात्र कुणालाच कळल नाही. अखेर दिवे लावले आणि निवांत झोपलो......            सकाळी सारे जरा उशीरच उठले ...शरीर शुद्धी
चहा नास्ता,फोडणीचा भात,मुगाची उसळ यातच बरासचा वेळ निघून गेला त्यातच आमची गप्पांची मैफिल जमली होती...मी, सुदेश, अनिल भाऊ,आशितोष,अंकुर,संदीप भाऊ संदीप भाऊंच म्हणाल तर एक अवलियाच ...त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात वेगळीच मजा...एकदम नेमकं आणि मुद्देसूद बोलणार व्यक्तिमत्व...असो  समोरील दृश्य म्हणाल तर अवर्णनीय होत समोर हरिशचंद्रेश्वराच मंदिर .त्यावर उगवलेली पिवळी सोनकीची फुलं...मंदिराला निसर्गाने केलेली अवर्णनीय
सजावटच जणू ....मंदिराच्या मागच्या बाजूस घळीमध्ये मेघ जसे साठवून ठेवले होते....तो निसर्गही त्यांना आकाशी पाठवण्यास उत्सुक नव्हता .... पूर्ण परिसरात जागोजागी तंबू आणि मानसी रिंगण दिसत होते ...सारेजण ती निसर्गाची मुक्त उधळण डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होते.....         उशिरा उठल्यामुळे  तारामती वर काही जाता आलं नाही. वेळे अभावी ठरलं कि आता पाचनई च्या दिशेने प्रयाण करायचं तदपुर्वी ठरलं कि मुंबईकर कोकण  कड्याच्या दिशेने गेले आणि ते येईपर्यंत आम्ही पालाघरकर केदारेश्वराच्या मंदिरात.... हरिशचंद्रा पासून खाली
गेले की केदारेश्वरचे गुहेत अर्धा पुरुष उंचीचे अप्रतिम शिव लिंग आहें .पिंडी भोवती कमरे इतके पाणी आहें . हे पाणी इतके थंड आहें की त्यात हात ही घालू शकत नाही पण आम्ही आंघोळ केली आणि त्या थंड पाण्याचा मनमुराद आनंद लुटला.. आम्ही सर्वांनी पिंडीभोवती प्रदक्षिणा मारल्या...या ठिकाणी असलेले चार खांब हे चार युगांचे प्रतिक मानले जातात व त्यातले तीन खांब कोसळले आहेत.एक तेवढा शेष आहे....शंभराची नोट होतीच ..क्लिकही भरपूर मारले ... 
  
तदनंतर आही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पुन्हा तीर्थ कुंडात मनसोक्त पोहलो...तितक्यात कोकण कड्यावरून बाकीचेही खाली उतरून आले होते.काही वेळ अंघोळ करून आम्ही पाचनई च्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो. मुंबईकर तेवढे केदारेश्वraचे दर्शन घेण्यासाठी खाली गेले. अवघड वाटा,जंगल, कड़े कपारी, पायाखाली तुडवित खाली पुन्हा मंगळगंगेत पोहण्याचा आनंद लुटत होतो. पाण्यात दिसणारी प्रतीमा याचं तर शब्दात वर्णन अशक्य. स्वतः ला विसरायला लावण्याचं कसब त्या
परिसरात नक्कीच आहे. ...बराच वेळ निघून गेला तरी बाकीचे काही खाली उतरले नव्हते ...एवडा वेळ का लागला असेल या विचारात आम्ही होतोच ....मनात पाल चुकचुकत होती....मागे महिला आणी मुलांची संख्या जास्त होती...तितक्यात वृंदा द, सुजा  ताई आणि आर्या नजरेस पडले  ...मग आम्हीही पुढे निघालो.....तितक्यात खालून वर चढताना एक ४० शितील असतील विकलांग अनवाणी गृहस्त दिसले त्यांना पाहून आपल्या मिरवण्याची लाज वाटू लागली ....मनातच त्यांच्या जिद्दीला सलाम केला..पुढच्या घळीजवळ वृंदा द विचारलं कि का विचारलं म्हणून तर माहित पडल कि शुभांगी ताई यावेळेसही पडल्या ,नुसत्या पडल्या नाहीत तर पडून उठण्यासाठी त्यानी तीन गुलात्या मारल्या होत्या ....डोक्याला जबर मार बसला होता ..रक्ताने डोकं भिजून गेल होत.आर्या हि त्याच्याबरोबर पडली होती परमेश्वर कृपेने ती सुखरूप होती....पण आईची अवस्था पाहून ती ओक्साबोक्सी रडत होती ....तिला सावरताना निश्चितच सर्वांची दमछाक निघाली असेल.तो अनुभव आम्हाला भीमाशंकरला अशा समूहात  अनेक जन समाजातून निरनिराळ्या ठिकानाहून येत असले तरी समूहात एकतेची  भावना निर्माण झालेली असते , कुठच्याही परिस्तिथीला एक दिलाने समोर जाण्याची ताकत त्या समूहामध्ये असते, डोंगरयात्री हि एक परिवाराच आहे.... त्यात काही वाद नाही...आम्हीही त्याचा हिस्सा झालो आमचे भाग्यच....आला होता....म्हणून त्यांcha तिथे वेळ गेला होता....सारे काहीसे नैराश्य मुद्रेने खाली उतरलो.....आर्याचाही
चेहरा पडला होता... नंतर सारं काही सुरळीत झालं म्हणा... हीच तर ताकत असते एका कर्तव्य दक्ष समूहाची,
       खाली २.००च्या आसपास खाली उतरलो....जेवणाची सोय भास्कारांच्या घरी होती ....ज्वारीची भाकरी,पिठलं.भात, वरण, लोणचं.... मस्त पैकी जेवलो तितक्यात डोक्याला पट्टा बांधून शहेनशहा च आगमन हि झालं होतं ....म्हणजे आपल्या शुभांगी ताई....!! तश्या एकदम फिट होत्या... अनुभवी ट्रेकर्स त्या...एकदम बिन्दास्त......ते सारे जेऊन येईपर्यंत आम्ही गाडीपाशी झाडाखाली बसलो मग काय...? पुन्हा गप्पांची मैफिल पालघरकर .डहाणूकर ,मुंबईकर.....अजय ने हि रानात जाऊन रान आवळे आणले होत ते खट मस्त गप्पा मारल्या..आणि बसलो बसमधे....ट्रेक यशस्वीरीत्या संपन्न झाला होता .आता परतीचा प्रवास.......
पण मनात मात्र असंख्य विचार येत होते आज आपल्याकडे असंख्य सोयी सुविधा आहेत तरीही हे रस्ते ओलांडताना ते किती खडतर आहेत याचा  मात्र पावलो पावली अनुभव येत होता .या महाराष्ट्रावर परकियानी कसे काय राज्य केले? इथल्या  जंगलात ते हरवले कसे नाहीत ? इथले दगड धोंडे त्याना कधीच आडवे गेले नाहीत काय? कड़े  कपारयात पडून त्यांचा कपाळमोक्ष कसा नाही झाला ? लेखन्या मोड़ा आणि बंदुका हाती घ्या असे संगनारे इथे जन्मले तरी हा देश पारतंत्र्यात कसा गेला? राकट देशा कणखर देशा दगडां च्याही  देशा म्हणनारे आहेत .पण ते टिकवता का नाही आले ..? छत्रपती शिवरायांनी त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांनी जे स्वराज्य घडविले ते का टिकवता आले नाही ? का आपलीच माणसं आपल्या माणसाचे पाय ओढत असतील ...? का आपलीच माणसं आपल्या माणसांवर राज्य करत असतील ?  ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांनी डोकं वर्तुळाकार सैरवैर फिरत राहत...असो मी माझ्या परीने निश्चितच काहीतरी प्रामाणिक पाऊल टाकण्याचा नव्हे तर ते स्वराज्य टिकवण्याच प्रयत्न केला पाहिजे ......बाकी श्रींची इच्छा ...या कलयुगात इथे जान्हवीचा श्रीही म्हणायला कमी करणार नाहीत म्हणा...कस आहे ना ...तमोगुणी माणसाची संख्या वाढली कि चांगल्या माणसांना त्रास होणार हे निश्चित ......असो
       पण एक आहे जर तुम्ही सह्याद्री वेडे आहात . तर पाउस म्हणजे काय हे वेगळ्या शब्दात काही सांगायला नको . कारण पाऊस आणि सह्याद्री म्हणजे विहिंगमय मनवेडं रूप....ते अनुभवायला पावसात सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भटकावं लागतं....ते वेड मला लागायला हवं .....इतकच म्हणेन मी........  डोंगरयात्री समूहाचे आभार.....
                                           जय शिवराय .......
भीमाशंकर-डोंगरयात्री
https://www.blogger.com/blogger.g?blogID=8521127886953468435#editor/target=post;postID=7558874240672262141;onPublishedMenu=allposts;onClosedMenu=allposts;postNum=8;src=postname

        @ नित
                                                                                                  नितेश पाटील 
                                                                                                 ९६३७१३८०३१
                                                                                                GOOGLE :- niteshpatil715