पुर्वी शाळेत असताना माझा गणवेश एकच .......त्यामुळे तोच दररोज घालणं दुसरा विकल्प नाही...तोही झिझला होता त्यालाही कप्पे मारले होते जसे माझ्या आंतरमनाला मारले होते.आता तो शब्द आहे बघा काॅम्प्रमाईझ....आपल्याच मनानी आपल्याच मनाशी केलेलं काॅम्प्रमाईझ....पण समाजात कावळ्यासारखी काही लोकं असतात...त्याना चांगलं जनावर आवडत नसतं...त्याना टिचार टाचार पडलेल्या जनावरांची फार आवड...... म्हणजे हे चोच टाकायला मोकळे....असो.... ते गणवेशाला मारलेले कप्पे पाहून काही मुलं हसत,हिनवतही होती ....त्यांच्या दृष्टिने ती मस्करी असेलही....रुपयांचा माज म्हणता येणार नाही कदाचीत तितके संस्कारही नसतील...समजही नसेल...
पण पाचवी ते नववीची मुलं ईतकी नासमझ तर नक्कीच नसतील...आमची परीस्तीथीच बेताची तर आम्ही काय करणार.....पण हे त्यानाही कसं कळनार ना.......तुम्हाला एकदा सवय झाली ना की जमतं सारं काही...कुठल्याही बाबतीत....सहण करत रहायचं....परमेश्वर तेच दिवस ठेवत नसतो...... जे डिचवत होते त्यांचीही परीस्तिथी आज काही ठीक नाही....काही व्यसनाधीन होऊन भटकतायेत .....तर कोणि हयात नाहीये....असो सांगायचं काय तर आज आपण समाजात पहातोय...नवतरुण मुलांच्या जीन्सना कप्पेच कप्पे....मधेच त्या फाटलेल्याही असतात ......आता काय तर म्हणे ती फॅशन.....मुलींनाही त्यातुन मोह आवरता येत नाही....जमान्याबरोबर चालनंही गरजेचं आहेच म्हणा...
बरं त्यांच्या किमतीही काही कमी नाहीत.....
पुर्वी रुपये नव्हते म्हणून गरीबीमुळे फाटके कपडे घालायची वेळ यायची....आज रुपये आहेत म्हणुन आणि फॅशन म्हणून फाटके कपडे घालतात.....
शेवटी कोणी कसले कपडे घालावेत हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी गरीबाना त्या बाबतीत हिनवू नये......हिनवत नसतलही पण काही टगे असतात...हे ही नाकारता येणार नाही... आजही गरीबी कमी झालय असं मला वाटत नाही....आजही काही मुलांची तीच परीस्तिथी आहे जी कधीकाळी माझीही होती.....आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या युगात आपण कुणाला कोणाशी कसं वागावं हे सांगु शकत नाही.....ते ज्याच त्याला कळायला हवं.....शेवटी तुम्ही जे पेरालं तेच ऊगवतं हे लक्षात असलं पाहीजे...ते जमिनीवर अवलंबून असतं.....किती दिवसात बाहेर येतं ते.....आपण नेमकं ते लक्षात ठेवत नाही आणि बोंबलत सुटतो....पिढी बिघडली...पिढी बिघडली....अरे पण पिढी बिघडुू नये म्हणून आपलंही काही कर्तव्य आहेच की....मुलं मोठ्यांच अणुकरन करत असतात.....त्यानी चुकीचं काही केलं तरी आपण त्यांच कौतुक करत असतो......लहान मुलांच बघा तुम्ही....बाकी काही नाही जमलं तरी त्याना माणसानी माणसाशी माणसा सारखं वागावं... ईतकं शिकवल तरी पुरे.....
बाकी म्हंटलयच.....
जगीं जीवनाचे सार
घ्यावे जाणूनि सत्वर ।
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ‘इश्वर’ ।।
........नितेश पाटील