Sunday, September 3, 2017

पावसाचा कहर

आज पावसाने कहरच केला म्हणायचा...
याला कसं जमतं लगेच साठवायला कोण जाणे...
स्वतः रीतं होतो, आम्हाला मात्र भरून पुरतो
नाही म्हणजे विचार वैगरे काही,
की तसली भानगडच नाही ...
आपली आली लहर आणि केला कहर...
तुला समजायला हवं नारे...
वरूनच बरसतोस ना तू...
तुला दिसत नाही असं कसं मानू मी..
लोकांना वेठीस धरनं कसं रे मनावतं तुला
इथे ऐकलं तरी हळहळतो आम्ही...
आणि पुन्हा पुन्हा का करतोस असं
तुझं बरसनं, तुझं गरजनं, तुझी खळखळ
सारंच ऐकतो ना रे आम्ही..
म्हणजे तू मुका तर नाहीच आहे ना...
मग बोल की तुला नेमकं काय हवंय...
वरून खाली पडतांना तुलाही लागत असेल ना रे
पण तुझ्या इतकं आम्ही कसं सहन करणार
तू मिसळतोस रे कश्यातही
आपलंसं करून टाकतोस
पण आमचं तसं नाही ना
आम्ही किती जाती धर्माची माणसं
माणसं असली तरी,
साऱ्यांची तऱ्हा निराळी जाणतोस ना तू
पण अश्या अडचणीच्या वेळी आम्ही
एक होतो हे ही पहिलंच असेल की तू...
सण उत्सवांचे दिवस...
त्यात आज पाच दिवसांचे बाप्पा जाणार
किती धामधूम असते माहितेय ना तुला...
मगआमच्या हक्काचे फटाके तू का वाजवतोस
आमचे मात्र भिजवून ठेवलेस...
त्या धामधुमीतुन शेवट कसा रडवेला होतो
पाहतोस ना तू...
घरात कायमस्वरूपी असला तरी,
हा बाप्पा विसर्जित करतांना
जीव कासावीस होतोच रे आमचा...
तरीही करून आलो विसर्जन
तेही वाजत गाजत
पाहिलंस असेल तू
अरे रस्ते वाहनांसाठी असतात
त्यावरून तूच वाहत होतास
अरे मग आम्ही चालायचं कोठून
हे तुला कळायला हवं ना यार
अरे तुझ्या येण्याचा आम्हाला आनंदच आहे
पण असा अंदाधुंद नकोस ना राजा येऊ
प्रेमाने जग जिंकता येतं रे
हे आम्हाला नाही कळलं
निदान तू तरी समजून घे
तुंबलेलं पाणी दिसत नाही का तुला...
मग तिथे थांबायला हवं की नको
बघ राजा मी तुला सांगायचं काम केलं
आता तूच ठरव बरं का...
____नित
९६३७१३८०३१

नितेश पाटील (धनसार, पालघर)

No comments: